शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकसभा निवडणुकीत जालन्यात दानवेंना चितपट करणारच; बच्चू कडूंनी दंड थोपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 11:52 IST

जालन्यातून निवडणूक लढवण्यासाठी बच्चू कडूंची जोरदार तयारी

अमरावती: अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना चितपट करुनच जालन्यातून परत येऊ, असा निर्धार बच्च कडू यांनी केला आहे. बच्चू कडूंच्या विधानावर अद्याप दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना साले म्हटलं होतं. तूर खरेदीबद्दल बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. 'इतकी तूर खरेदी केली, तरी रडतात साले,' असं दानवे म्हणाले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी दानवेंच्या विधानाचा निषेध केला होता. त्यानंतर आता कडू यांनी दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या दानवेंविरोधात आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेची निवडणूक लढवू, असं कडू आधीच म्हणाले होते. जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं बच्चू कडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दानवे यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याची टीका त्यांनी केली. दानवेंच्या मतदारसंघात रेतीची तस्करी चालते, अवैध दारु विक्री चालते, अशा शब्दांमध्ये त्यांनी दानवेंवर तोंडसुख घेतलं.   

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Farmerशेतकरी