शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘राज’कीय दौरा अन् ‘जय महाराष्ट्र’!

By गजानन चोपडे | Updated: September 23, 2022 11:06 IST

त्यांनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत विदर्भात पक्षात फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले.

अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा काल आटोपला. विदर्भ एक्स्प्रेसने आगमन अन् अमरावतीतून अंबानगरी एक्स्प्रेसने प्रस्थान झाले.

राज ठाकरे रेल्वेने प्रवास करताहेत म्हटल्यावर सुरक्षा यंत्रणा चौकस होतीच, शिवाय कार्यकर्तेही अलर्ट होते. नुसते पद घेऊन मिरवत असाल तर खबरदार, सामान्य माणसासाठी झटावं लागेल, पक्षवाढीसाठी जीवाचं रान करणाराच पक्षात टिकेल, असे सांगत अमरावतीच्या विभागीय बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. पक्ष बांधणीसाठी झालेल्या या दौऱ्यात राज यांना अनेक बाबींचा उलगडा झाला.

राज ठाकरे यांची लोकप्रियता कायम असताना मनसेचा ग्राफ मात्र वाढत का नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाळ जोपर्यंत सामान्यांशी जुळत नाही, तोपर्यंत पक्ष काही वाढणार नाही, ही बाब राज यांनी हेरली. त्यामुळेच की काय त्यांनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत विदर्भात पक्षात फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले.

कालपर्यंत सक्रिय नसलेले पदाधिकारी अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. अमरावतीत मात्र मनसेतही गटबाजी आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवली ती राजसाहेबांच्या होर्डिंग्जवरून. त्यामुळे विभागीय बैठकीत पाहिजे तशी गर्दी दिसली नाही. शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे मनसेला पक्षवाढीची ही संधी चालून आली आहे. विदर्भात मनसेची पाळेमुळे रुजली की त्याचा फटका आपसूकच शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा मनसेसाठी महत्त्वाचा मानला जातो. येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करण्याचा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला; परंतु त्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे. नागपुरात तर पक्षात काही चुकीच्या गोष्टींना थारा दिला जात असल्याचे खुद्द राज ठाकरे यांनी मान्य केले.

नागपुरात किंबहुना विदर्भात जसा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नसल्याचे मान्य करीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अमरावतीतही तशीच स्थिती आहे. राज ठाकरे यांच्या दाैऱ्यानिमित्त अमरावतीत या पक्षाची उपस्थिती दिसली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पक्षवाढीसाठीची तळमळ राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यातून दिसून आली, हे मात्र खरे. अनेक तरुण-तरुणींच्या मनात ‘फायर’ आहे, असे सांगत त्यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नव्याने पक्ष बांधणीचा राज यांचा संकल्प पक्षातील अनेकांना ‘जय महाराष्ट्र’ करणारा ठरणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेVidarbhaविदर्भ