शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बेपत्ता आकाशचा इंदूरमध्ये मृत्यू, ‘मानवी तस्करी’चा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:16 IST

पाच महिन्यांनंतर धागेदाेरे : जानेवारी अखेरीस मिसिंगची तक्रार

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात येथे उघड झालेल्या ‘मानवी तस्करी’ प्रकरणातील आकाश वेरूळकर याचा १ फेब्रुवारी रोजीच मध्यप्रदेशातील इंदूर येथे आकस्मिक मृत्यू झाल्याचे तब्बल सव्वा पाच महिन्यांनंतर उघड झाले. गुन्हे शाखेने बुधवारी हा उलगडा केला. २९ जानेवारी रोजी आकाश वेरूळकर (२५, रा. महात्मा फुलेनगर, नवसारी, अमरावती) हा घरून बेपत्ता झाल्याची नोंद गाडगेनगर पोलिसांनी घेतली होती.

येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजस्थानी कुटुंबाला विकण्यात आले. एका राजस्थानी व्यक्तीशी बळजबरीने तिचा विवाह लावून देण्यात आला; मात्र दहा दिवसांनंतर तिने तेथून पळ काढून अमरावती गाठले. त्यानंतर मानवी तस्करी अर्थात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच जणांविरुद्ध अपहरण व मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला.

ती अल्पवयीन मुलगी आकाश वेरूळकर याच्यासोबत २७ जानेवारी रोजी इंदूरला गेल्याचे तपासात समोर आले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर दोघांमध्ये फाटाफूट झाली. त्यामुळे २७ पासूनच बेपत्ता असलेल्या आकाशच्या शोधार्थ पोलिसांचे विविध पथके इंदूरसह, बऱ्हाणपूर, रतलाम गेले होते. मात्र, त्या वेळी त्याचा शोध लागू शकला नव्हता.

आकाशसोबत गेलेली मुलगी परतली

दरम्यान, आकाशसोबत गेलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १२ फेब्रुवारी रोजी घरी परतल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेने आपणास अमरावतीच्या बसस्थानक परिसरातून भूलथापा देऊन रतलाम येथे नेले. आरोपींनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवून राजस्थानला चार ते पाच लाखांमध्ये विकले. तत्पूर्वी, त्यांनी मध्य प्रदेशातील रतलाम येथे आपले लग्न लावून दिले. रतलाम येथे लग्न लागत असताना आकाशसोबत असल्याची कबुली तिने दिली होती.

मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे हे या प्रकरणाचा तपास करत असताना इंदूरनजीकच्या एका पोलीस ठाण्यात मर्ग दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेथे जाऊन तपास केला असता, ती नोंद आकाश वेरूळकरची असल्याचे लक्षात आले. १ फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह इंदूरनजीक आढळून आला होता. इंगळे यांनी पीएम रिपोर्ट पाहिला असता त्याचा मृत्यू कार्डियक अटॅकने झाल्याचे स्पष्ट झाले. सबब, आकाशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाल्याचे इंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती