लाखो लीटर शुद्ध पाणी गेले व्यर्थ
By Admin | Updated: May 19, 2014 23:15 IST2014-05-19T23:15:12+5:302014-05-19T23:15:12+5:30
लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठय़ासाठी तयार करण्यात आलेल्या जीवन प्राधीकरणाच्या योजनेला आज साकोलीत गालबोट लागले.

लाखो लीटर शुद्ध पाणी गेले व्यर्थ
साकोली : लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठय़ासाठी तयार करण्यात आलेल्या जीवन प्राधीकरणाच्या योजनेला आज साकोलीत गालबोट लागले. रात्री ९ वाजेदरम्यान जीवन प्राधीकरण विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयासमोरील वॉल लिकेज झाला व नागझिरा मार्गावर पुराची स्थिती दिसत होती. या लिकेजमुळे लाखो लीटर शुद्ध पाणी वाया गेले. साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावासाठी शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासाठी जीवन प्राधीकरण व हुडकोच्या अर्थसहायाने साकोली येथे जलशुद्धीकरण योजना तयार करण्यात आली. या योजनेला तसे सुरुवातीपासूनच ग्रहण लागले. ऐनकेन प्रकारे ही योजना पूर्ण व्हायला व सुरू व्हायला तारेची कसरतच करावी लागली. ही संपूर्ण योजनाच निम्न चुलबंद प्रकल्पावर आधारित असल्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावरच ही योजना मागील वर्षी सुरू झाली. जलशुद्धीकरण योजनेसाठी चुलबंद नदीतून पाणी गडकुंभली टेकडीवरील जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले जाते. यानंतर हे शुद्ध पाणी नागझीरा रोडवर असलेल्या पाण्याच्या टाकीत हे पाणी सोडून पाईप लाईनद्वारे हे शुद्ध पाणी साकोली व लाखनी तालुक्यातील गावांना पाठविले जाते. मात्र या टाकीच्या खालीच असलेल्या वाल लिकेज झाल्यामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावर वाया गेले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबाथेंबाला महत्व असताना ऐवढे पाणी वाया गेले तरी अधिकार्यांनी रात्रीच त्याची सोय केली नाही. (तालुका प्रतिनिधी)