शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:47 IST

मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

- पंकज लायदे अमरावती - मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत. मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता महाराष्ट्रात यंदा नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे अशा चार मोठ्या शहरांमध्ये 'राखी महोत्सव'देखील साजरा केला जाणार आहे. मेळघाटातील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांच्या कौशल्याने तब्बल सव्वा लाख बांबू राख्या आकारास आल्या आहेत.धारणी तालुक्यातील लवादा येथे २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून कार्यरत संपूर्ण बांबू केंद्राने 'बांबू राखी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मेळघाटातील बांबू वापरून येथीलच आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या राख्या राज्यात आणि देशात उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनेही या संकल्पनेचे स्वागत केले असून, परिषदेच्या मदतीने विविध ३७ देशांमध्ये ही बांबू राखी पोहचविली जाणार आहे.

 सव्वा लाख राख्या महाराष्ट्रातील चार मोठ्या शहरांमध्ये यंदा राखी महोत्सव केला जाणार आहे. त्यातून मेळघाटच्या कारागिरांचे कौशल्यही राज्यातील नागरिकांसमोर येईल. सुमारे सव्वा लाख बांबू राख्या तयार करण्यात आल्या आहेत. धारणी जिल्ह्यातील लवादा येथेच या राखी बनविण्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना होईल.  विद्यार्थ्यांना किट्ससंपूर्ण बांबू केंद्राने राखी बनविण्याच्या ५० हजार किट्स उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील एक हजार शाळांशी संपर्क करून त्यांना या किट्स पुरविण्यात येतील. अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत बांबू राखीची संकल्पना पोहचविण्याचा आमचा विचार आहे, असे सुनील देशपांडे यांनी सांगितले. राखीचा ब्रँड महिला कारागिरांच्या नावेसुमारे ५० महिला आणि पुरुष कारागिरांनी तीन महिन्यांच्या मेहनतीतून तयार केलेल्या राख्यांना त्या महिला कारागिरांची तसेच पुरुष कारागिराच्या पत्नीचे नाव ब्रँडकरिता देण्यात आले. पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मेळघाटातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. तथापि, राखीमुळे सुमारे सात गावांमधील महिलांना स्थलांतर झालेले नाही. संपूर्णत: नैसर्गिक असलेली ही राखी महिलांना स्वाभिमानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन ठरली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनMelghatमेळघाटMaharashtraमहाराष्ट्र