शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:47 IST

मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

- पंकज लायदे अमरावती - मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत. मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता महाराष्ट्रात यंदा नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे अशा चार मोठ्या शहरांमध्ये 'राखी महोत्सव'देखील साजरा केला जाणार आहे. मेळघाटातील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांच्या कौशल्याने तब्बल सव्वा लाख बांबू राख्या आकारास आल्या आहेत.धारणी तालुक्यातील लवादा येथे २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून कार्यरत संपूर्ण बांबू केंद्राने 'बांबू राखी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मेळघाटातील बांबू वापरून येथीलच आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या राख्या राज्यात आणि देशात उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनेही या संकल्पनेचे स्वागत केले असून, परिषदेच्या मदतीने विविध ३७ देशांमध्ये ही बांबू राखी पोहचविली जाणार आहे.

 सव्वा लाख राख्या महाराष्ट्रातील चार मोठ्या शहरांमध्ये यंदा राखी महोत्सव केला जाणार आहे. त्यातून मेळघाटच्या कारागिरांचे कौशल्यही राज्यातील नागरिकांसमोर येईल. सुमारे सव्वा लाख बांबू राख्या तयार करण्यात आल्या आहेत. धारणी जिल्ह्यातील लवादा येथेच या राखी बनविण्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना होईल.  विद्यार्थ्यांना किट्ससंपूर्ण बांबू केंद्राने राखी बनविण्याच्या ५० हजार किट्स उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील एक हजार शाळांशी संपर्क करून त्यांना या किट्स पुरविण्यात येतील. अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत बांबू राखीची संकल्पना पोहचविण्याचा आमचा विचार आहे, असे सुनील देशपांडे यांनी सांगितले. राखीचा ब्रँड महिला कारागिरांच्या नावेसुमारे ५० महिला आणि पुरुष कारागिरांनी तीन महिन्यांच्या मेहनतीतून तयार केलेल्या राख्यांना त्या महिला कारागिरांची तसेच पुरुष कारागिराच्या पत्नीचे नाव ब्रँडकरिता देण्यात आले. पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मेळघाटातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. तथापि, राखीमुळे सुमारे सात गावांमधील महिलांना स्थलांतर झालेले नाही. संपूर्णत: नैसर्गिक असलेली ही राखी महिलांना स्वाभिमानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन ठरली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनMelghatमेळघाटMaharashtraमहाराष्ट्र