शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:47 IST

मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

- पंकज लायदे अमरावती - मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत. मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता महाराष्ट्रात यंदा नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे अशा चार मोठ्या शहरांमध्ये 'राखी महोत्सव'देखील साजरा केला जाणार आहे. मेळघाटातील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांच्या कौशल्याने तब्बल सव्वा लाख बांबू राख्या आकारास आल्या आहेत.धारणी तालुक्यातील लवादा येथे २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून कार्यरत संपूर्ण बांबू केंद्राने 'बांबू राखी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मेळघाटातील बांबू वापरून येथीलच आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या राख्या राज्यात आणि देशात उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनेही या संकल्पनेचे स्वागत केले असून, परिषदेच्या मदतीने विविध ३७ देशांमध्ये ही बांबू राखी पोहचविली जाणार आहे.

 सव्वा लाख राख्या महाराष्ट्रातील चार मोठ्या शहरांमध्ये यंदा राखी महोत्सव केला जाणार आहे. त्यातून मेळघाटच्या कारागिरांचे कौशल्यही राज्यातील नागरिकांसमोर येईल. सुमारे सव्वा लाख बांबू राख्या तयार करण्यात आल्या आहेत. धारणी जिल्ह्यातील लवादा येथेच या राखी बनविण्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना होईल.  विद्यार्थ्यांना किट्ससंपूर्ण बांबू केंद्राने राखी बनविण्याच्या ५० हजार किट्स उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील एक हजार शाळांशी संपर्क करून त्यांना या किट्स पुरविण्यात येतील. अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत बांबू राखीची संकल्पना पोहचविण्याचा आमचा विचार आहे, असे सुनील देशपांडे यांनी सांगितले. राखीचा ब्रँड महिला कारागिरांच्या नावेसुमारे ५० महिला आणि पुरुष कारागिरांनी तीन महिन्यांच्या मेहनतीतून तयार केलेल्या राख्यांना त्या महिला कारागिरांची तसेच पुरुष कारागिराच्या पत्नीचे नाव ब्रँडकरिता देण्यात आले. पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मेळघाटातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. तथापि, राखीमुळे सुमारे सात गावांमधील महिलांना स्थलांतर झालेले नाही. संपूर्णत: नैसर्गिक असलेली ही राखी महिलांना स्वाभिमानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन ठरली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनMelghatमेळघाटMaharashtraमहाराष्ट्र