शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटचा टँकर पळविला

By admin | Updated: April 30, 2017 00:12 IST

गत महिनाभरापासून तालुक्यातील १५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन टँकरने सहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

आदिवासींची भटकंती : तारुबांद्यात उपसभापतींना घेराव, १५ गावांत पाणी पेटलेचिखलदरा : गत महिनाभरापासून तालुक्यातील १५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन टँकरने सहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मेळघाटसाठी जिल्ह्यातून पाठविलेला टँकर परस्पर चांदूररेल्वे तालुक्यात पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील पल्लई, लवादा, आलापोट, भांडी ढोमणीफाटा, तारूबांदा या सहा गावांना पाणी पुरवठा केला जात असून, एक महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झलेल्या तारुबांदा, बदनापूर, ठोबनबल्डी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, गौलखेडा बाजार, आठवनदी, मनभंग, भिलखेडा या गावातसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. सचिव बेपत्ता, अपूर्ण प्रस्ताव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सचिव मुख्यालयी न राहता परतवाडा, अमरावती येथून ग्रामपंचायतींचा कारोबार पाहत असल्याने त्याचा फटका आदिवासींना बसला आहे. पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकांकडून प्रस्ताव न पाठविले, अपूर्ण पाठविल्या जात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी )टँकरची पळवापळवीचिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईग्रस्त गावे पाहता जिल्हास्तरावरून टँकरचे नियोजन करण्यात आले. मात्र, येथे येणारा टँकर चांदूररेल्वे तालुकयातील या गावी १५ दिवसांपूर्वी पळविला. परिणामी तारुबांदा येथे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कुणी फिरविला याची तपासणी करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी केली आहे. तारूबांदा येथे आदिवासींनी गुरूवारी रात्री त्यांना पाण्यासाठी घेराव घातला. माजी आमदारांच्या गावात पाणीटंचाईमेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे व विद्यमान सभापती कविता काळे यांच्या गौलखेडा बाजार या गावात पाणीटंचईची समस्या उद्भवली असून, तेथेसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.विहिरी अधिगृहितटँकरसह पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कोरडा, वस्तादूर, कालापाणी, टंडू, मल्हारा, चिखली येथील विहिरी आणि बोअरवेल अधिगृहित करण्यात आले आहे. मात्र, टँकरच नसल्याने अनेक गावात प्रशासनाच्या लापरवाहीने आदिवासंींना पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. सहा गावांमध्ये तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. - सैफन नदाफ, तहसीलदार, चिखलदरा