शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मंडीला आग; चार हजार कॅरेट संत्रा, ट्रक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापुर्वीत त्या आगीने संत्रा असलेली प्लास्टिकची सुमारे चार हजार कॅरेट कवेत घेतली. ती कॅरेट आगीत भस्मसात झाली. सोबतच एक ट्रकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे १६ लाख रुपये किंमतीचा ट्रक व २० ते २४ लाख रुपये किमतीचा संत्रा व कॅरेट पुर्णपणे जळाल्याने सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा मंडीचालक ऋषी उपल यांनी वर्तविला.

परतवाडा : परतवाडा- अंजनगाव सुर्जी मार्गावरील सावळी दातुरा-हनवतखेडा गावालगत असलेल्या एका संत्रा मंडीला आग लागून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही आग लागली. प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता अचलपूर पालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.ऋषी हरिश्चंद्र उपल (रा. वाघामाता परिसर, परतवाडा) यांच्या मालकीची अंजनगाव सुर्जी मार्गावर किसान संत्रा मंडी आहे. या मंडीतून संत्र्याची आयात निर्यातही केली जाते. त्यासाठी ४ हजारपेक्षा अधिक कॅरेटमध्ये संत्रा भरुन ठेवण्यात आला होता. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी संत्रा मंडीत काम सुरु असतानाच अचानक आगेचे लोळ उठले. अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापुर्वीत त्या आगीने संत्रा असलेली प्लास्टिकची सुमारे चार हजार कॅरेट कवेत घेतली. ती कॅरेट आगीत भस्मसात झाली. सोबतच एक ट्रकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे १६ लाख रुपये किंमतीचा ट्रक व २० ते २४ लाख रुपये किमतीचा संत्रा व कॅरेट पुर्णपणे जळाल्याने सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा मंडीचालक ऋषी उपल यांनी वर्तविला. घटनास्थळावर अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संदेश जोगदंड, त्यांचे सहकारी व अंजनगाव नगरपालिकेचे पथक पोहोचले. तीन बंबाच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती. स्थानिक ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संजय गायकवाड व सहकारी घटनास्थळी होते. याशिवाय मंडीतील काही सयंत्रे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :fireआग