शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक?

By गणेश वासनिक | Updated: December 15, 2022 18:42 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३५ ते ४० वाघांचे आवागमन; बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे जंगलक्षेत्रात वास्तव्य

अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत. मात्र, आता व्याघ्र प्रकल्पातील वाघांना क्षेत्र कमी पडत असून, ताडोबा-अंधारी, बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे ‘आउटगोईंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, वणी, नागपूर, वर्धा, अमरावतीच्या जंगलात वाघांची भ्रमंती ही मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी मानली जात आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री अभयारण्य आहे. अलीकडे नांदेड, किनवट, पांढरकवडा, वणी या भागातही वाघांची भ्रमंती होत असल्याने भविष्यात या परिसरात मानव-वन्यजीव संषर्घ होण्याची दाट शक्यता आहे. पैनगंगा (किनवट), टिपेश्वर (पांढरकवडा), ताडोबा-अंधारी (चंद्रपूर) असा वाघांचा भ्रमंती मार्ग असल्याचे वन्यजीव विभागाने अधोरेखित केले आहे.

नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा वाघांचे कॉरिडॉर हे जागतिक वन्यजीव अनुदान संस्थेकडून मंजूर करण्यात येते. त्यानंतर वाघांच्या कॉरिडॉर व्यवस्थापनासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून अनुदान प्राप्त होते. त्यानुसार विदर्भ-मराठवाडा असा वाघांचा नव्या कॉरिडॉरचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच ताडोबा- अंधारी, टिपेश्वर, काटेपूर्णा, पैनगंगा या चार अभयारण्य कॉरिडॉरच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ मध्य प्रदेशात मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा दऱ्या-खोऱ्यांत वसलेला असून जंगल वैभवसंपन्न आहे. तथापि, येथील वाघ हे मध्य प्रदेशातील खरगौन जंगलापर्यंत आवागमन करतात. रानगवा, काळवीट, हरीण, रानडुक्कर या वन्यजीवांची शिकार करून वाघ उपजीविका भागवितो. मेळघाटात ३० ते ४० वाघ असल्याची नोंद आहे. दऱ्या, खोऱ्यांच्या जंगलामुळे वाघ हे क्वचितच व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडतात. मात्र, लगतच्या मध्य प्रदेशात वाघांचे आवागमन होत असल्याची माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे आवागमन वाढले हे खरे आहे. पण ते मानवासाठी धोकादायक ठरताहेत असे म्हणता येणार नाही. किंबहुना एखाद्या वाघाने मनुष्यावर हल्ला केला, असा अहवाल विभागीय वन कार्यालयातून प्राप्त झाल्यास त्याला नियमानुसार रेस्क्यू पथकाद्वारे जेरबंद करण्यात येते. वाघांच्या नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरी मिळविली जाते.

- महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पwildlifeवन्यजीवVidarbhaविदर्भ