शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक?

By गणेश वासनिक | Updated: December 15, 2022 18:42 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३५ ते ४० वाघांचे आवागमन; बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे जंगलक्षेत्रात वास्तव्य

अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत. मात्र, आता व्याघ्र प्रकल्पातील वाघांना क्षेत्र कमी पडत असून, ताडोबा-अंधारी, बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे ‘आउटगोईंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, वणी, नागपूर, वर्धा, अमरावतीच्या जंगलात वाघांची भ्रमंती ही मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी मानली जात आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री अभयारण्य आहे. अलीकडे नांदेड, किनवट, पांढरकवडा, वणी या भागातही वाघांची भ्रमंती होत असल्याने भविष्यात या परिसरात मानव-वन्यजीव संषर्घ होण्याची दाट शक्यता आहे. पैनगंगा (किनवट), टिपेश्वर (पांढरकवडा), ताडोबा-अंधारी (चंद्रपूर) असा वाघांचा भ्रमंती मार्ग असल्याचे वन्यजीव विभागाने अधोरेखित केले आहे.

नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा वाघांचे कॉरिडॉर हे जागतिक वन्यजीव अनुदान संस्थेकडून मंजूर करण्यात येते. त्यानंतर वाघांच्या कॉरिडॉर व्यवस्थापनासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून अनुदान प्राप्त होते. त्यानुसार विदर्भ-मराठवाडा असा वाघांचा नव्या कॉरिडॉरचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच ताडोबा- अंधारी, टिपेश्वर, काटेपूर्णा, पैनगंगा या चार अभयारण्य कॉरिडॉरच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ मध्य प्रदेशात मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा दऱ्या-खोऱ्यांत वसलेला असून जंगल वैभवसंपन्न आहे. तथापि, येथील वाघ हे मध्य प्रदेशातील खरगौन जंगलापर्यंत आवागमन करतात. रानगवा, काळवीट, हरीण, रानडुक्कर या वन्यजीवांची शिकार करून वाघ उपजीविका भागवितो. मेळघाटात ३० ते ४० वाघ असल्याची नोंद आहे. दऱ्या, खोऱ्यांच्या जंगलामुळे वाघ हे क्वचितच व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडतात. मात्र, लगतच्या मध्य प्रदेशात वाघांचे आवागमन होत असल्याची माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे आवागमन वाढले हे खरे आहे. पण ते मानवासाठी धोकादायक ठरताहेत असे म्हणता येणार नाही. किंबहुना एखाद्या वाघाने मनुष्यावर हल्ला केला, असा अहवाल विभागीय वन कार्यालयातून प्राप्त झाल्यास त्याला नियमानुसार रेस्क्यू पथकाद्वारे जेरबंद करण्यात येते. वाघांच्या नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरी मिळविली जाते.

- महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पwildlifeवन्यजीवVidarbhaविदर्भ