शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक?

By गणेश वासनिक | Updated: December 15, 2022 18:42 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३५ ते ४० वाघांचे आवागमन; बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे जंगलक्षेत्रात वास्तव्य

अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत. मात्र, आता व्याघ्र प्रकल्पातील वाघांना क्षेत्र कमी पडत असून, ताडोबा-अंधारी, बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे ‘आउटगोईंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, वणी, नागपूर, वर्धा, अमरावतीच्या जंगलात वाघांची भ्रमंती ही मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी मानली जात आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री अभयारण्य आहे. अलीकडे नांदेड, किनवट, पांढरकवडा, वणी या भागातही वाघांची भ्रमंती होत असल्याने भविष्यात या परिसरात मानव-वन्यजीव संषर्घ होण्याची दाट शक्यता आहे. पैनगंगा (किनवट), टिपेश्वर (पांढरकवडा), ताडोबा-अंधारी (चंद्रपूर) असा वाघांचा भ्रमंती मार्ग असल्याचे वन्यजीव विभागाने अधोरेखित केले आहे.

नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा वाघांचे कॉरिडॉर हे जागतिक वन्यजीव अनुदान संस्थेकडून मंजूर करण्यात येते. त्यानंतर वाघांच्या कॉरिडॉर व्यवस्थापनासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून अनुदान प्राप्त होते. त्यानुसार विदर्भ-मराठवाडा असा वाघांचा नव्या कॉरिडॉरचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच ताडोबा- अंधारी, टिपेश्वर, काटेपूर्णा, पैनगंगा या चार अभयारण्य कॉरिडॉरच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ मध्य प्रदेशात मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा दऱ्या-खोऱ्यांत वसलेला असून जंगल वैभवसंपन्न आहे. तथापि, येथील वाघ हे मध्य प्रदेशातील खरगौन जंगलापर्यंत आवागमन करतात. रानगवा, काळवीट, हरीण, रानडुक्कर या वन्यजीवांची शिकार करून वाघ उपजीविका भागवितो. मेळघाटात ३० ते ४० वाघ असल्याची नोंद आहे. दऱ्या, खोऱ्यांच्या जंगलामुळे वाघ हे क्वचितच व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडतात. मात्र, लगतच्या मध्य प्रदेशात वाघांचे आवागमन होत असल्याची माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे आवागमन वाढले हे खरे आहे. पण ते मानवासाठी धोकादायक ठरताहेत असे म्हणता येणार नाही. किंबहुना एखाद्या वाघाने मनुष्यावर हल्ला केला, असा अहवाल विभागीय वन कार्यालयातून प्राप्त झाल्यास त्याला नियमानुसार रेस्क्यू पथकाद्वारे जेरबंद करण्यात येते. वाघांच्या नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरी मिळविली जाते.

- महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पwildlifeवन्यजीवVidarbhaविदर्भ