शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

महात्मा फुलेंनी व्यवस्थेविरुद्ध लढण्यास माणसं उभी केली- सतेश्वर मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 20:26 IST

महात्मा फुलेंनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात माणसं उभी करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले, असे प्रतिपादन सतेश्वर मोरे यांनी केले.

अमरावती : महात्मा फुलेंनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात माणसं उभी करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले, असे प्रतिपादन सतेश्वर मोरे यांनी केले. व-हाड विकास प्रकाशन संस्थेच्यावतीने दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे डॉ.सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयात नववे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन शनिवारी पार पडले. त्याच्या अध्यक्षस्थानाहून मोरे बोलत होते. 

पत्रकार सचिन काटे यांनी महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी साखळीतून मुक्त करून संमेलनाचे आगळेवेगळे उद्घाटन केले. संमेलनाचे संयोजक श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रास्ताविक केले. आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुढील सत्रात सत्यशोधक सुनयना अजात, पी.आर.एस. राव यांनी परिसंवादात अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. सत्तेश्वर मोरे यांनी म. फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची अनिवार्यता व्यक्त करून म. फुलेंच्या विचाराचे आकलन, चिंतन व अनुकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ‘मी सावित्री बोलतेय’ ही बहारदार एकपात्री नाट्यकर्मी वैशाली धाकूलकर यांनी सादर केली. 

व्यासपीठावर प्राचार्य मधुकर आमले, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती बळवंत  वानखडे, संजय बेलोकार , सरपंच दिनेश शेवतकर,  उद्योजक सागर खलोकार, प्राचार्य अशोक पैठणे, पी.एम. भामोदे, प्रा. संतोष यावले, अजीज पटेल, सुदाम भगत आदींची उपस्थिती होती. दे.सु. बसवंत यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी कविसंमेलनात नीलिमा भोजणे, विजय वडगावकर, भास्कर बसवनाथे, शिवमती बारस्कर, आर.एस. तायडे, बबन इंगोले, प्रीतम जोहनपुरे, अरुणा लांडे आदी कवींचे सादरीकरण झाले. निलकंठ बोरोडे यांनी संचालन केले.