शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

महाराष्ट्र हा मराठ्यांचा; आरक्षण मिळालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:23 IST

महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. त्यांना आरक्षण नाही, तर कोणाला देणार, असा सवाल करीत मारवाडी समाजाचे मोहन जाजोदिया यांनी वालकट कम्पाऊंडजवळील पेट्रोल पंपाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. येथे लागलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देशासनाचा लक्षवेध : मारवाडी समाजाच्या मोहन जाजोदिया यांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. त्यांना आरक्षण नाही, तर कोणाला देणार, असा सवाल करीत मारवाडी समाजाचे मोहन जाजोदिया यांनी वालकट कम्पाऊंडजवळील पेट्रोल पंपाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. येथे लागलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले.राजस्थान जर मारवाडींचा, गुजरात गुजरातींचा, बंगाल बंगालींचा, केरळ केरळींचा, हरियाणा जाटांचा, पंजाब पंजाबींचा, तर महाराष्ट्र हा मराठ्यांचाच आहे. त्या-त्या राज्यांमध्ये स्थानिकांना जर सुविधा, आरक्षण आहे, तर महाराष्ट्रात मराठ्यांना का नाही? यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी रेटून धरली असल्याचे जाजोदिया यांनी सांगितले.राज्याची महती सांगताना ते म्हणाले, माझ्या आईचा अकोल्यात, तर माझा अमरावतीत जन्म झाला. लग्न, मुले येथेच झाली. आईचा मृत्यू येथेच झाला. माझाही मृत्यू येथेच होईल. आमच्या रक्तात महाराष्ट्राचा कण अन् कण आहे व याचा मला सार्थ अभिमानदेखील आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, मुंबईचा सिद्धिविनायक, मुंबादेवी, शिरडीचे साईबाबा, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, अंबादेवी आदी महाराष्ट्राची शान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.उपकार नाही, हक्क आहेमराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे; उपकार नाही किंवा भीक नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. आम्ही येथे व्यापार करतो. त्यामुळे आमचाही यामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे. यामध्ये कुठलाही जात, धर्म व राजकारणाचा हस्तक्षेप नाही, असे जाजोदिया यांनी फलकावर नमूद केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत छावा संघटनेचे शहर अध्यक्ष दिलीप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास काचोडे आदी सहभागी झाले.