शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

Maharashtra Election 2019 ; प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो.

ठळक मुद्देनिवडणूक रणसंग्राम : आठही मतदारसंघांत पकडला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ ऑक्टोबरला ५ वाजता संपणार आहे. १७ ऑक्टोबरपासून अवघे तीन दिवस प्रचारासाठी शिल्लक राहत असल्याने उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व समर्थकांनी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली आहे. ‘कोण आला रे कोण?’ अशा घोषणांनी गल्लीबोळात रॅली निघत आहे. पदयात्रेत डोक्यावर टोपी, गळ्यात दुपट्टा आणि उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर पिंजून काढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील इलेक्शन फिव्हर वाढविले आहे. त्यांच्या जोडीला दिग्गजांच्या होणाऱ्या सभांमुळे प्रचाराची रंगत आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो. मित्रमंडळी, पाहुणे यांना गाठून उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे. युवक संवाद, महिला मेळावा, ज्येष्ठांचा मेळावा यांची मांदियाळी सुरू आहे. निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठी, कार्नर सभा आणि समाजाच्या बैठकींना प्राधान्य देण्यात येत आहे. १९ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे राहिलेल्या कालावधीत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे. उमेदवार स्वत: नाही पोहोचला तरी घरातील व्यक्ती मतदारापर्यंत जावी, या पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले जात आहे.आठही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी अडीच ते तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार, कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. अंतिम टप्प्यात प्रचाराचा फेरआढावा घेतला जात आहे. एकगठ्ठा मतदान असलेल्या ठिकाणी पुन:पुन्हा जाऊन संपर्कात राहण्याचा प्रयत्न होत आहे. उमेदवार व समर्थक रात्री २ पर्यंत जाग्रण करीत आहेत. प्रचाराची वेळ संपल्यावर रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होते. त्यात दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचे नियोजन केले जाते. आहे. २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.सायंकाळची प्रचार रॅली, कार्नर बैठकींना पसंतीअलीकडे शेतीकामे जोरात सुरु असल्याने उमेदवार गावात पोहचले की, घरी मतदार मिळत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बहुतांश उमेदवारांनी प्रचारासाठी सायंकाळी पसंती दर्शविली आहे. प्रचार सभा, रॅली, कार्नर बैठकी अथवा रोड शो हे सायंकाळी आयोजन करण्यात येत आहेत.गुप्त बैठकींना वेगसकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत उमेदवार प्रचार रॅली, कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटी यात व्यस्त आहेत. मात्र, रात्री १० नंतर निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत गुप्त बैठकांनासुद्धा वेग आला आहे. विजयाचे प्लॅनिंग, एकगठ्ठा मते कशी मिळतील, याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. गावखेड्यात राजकीय दबदबा असलेल्या पुढाऱ्यांना या गुप्त बैठकीत महत्त्व दिले जात आहे. मतदान चार दिवसांवर आले असताना अशा खलबतांना वेग आल्याचे चित्र सर्व मतदारसंघांत आहे.सोशल मीडियाची साथदिवसभरात केलेला दौरा, मिळालेला पाठिंबा, घेतलेल्या बैठकी, भाषण आणि जाहीरनामे यांची इत्थंभूत माहिती मतदारांना मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. दुसºया दिवशीचे नियोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंंत पोहचविले जात आहे. परिसरानुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. त्या-त्या परिसरात उमेदवारांच्या प्रचाराची माहिती दिली जात आहे. प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याने सोशल मीडियाची मोठी साथ उमेदवारांना प्रचारासाठी लाभली आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती