शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:25 IST

'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ची जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. या घोषणेवरुनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे' हा भाजपचा अजेंडा असल्याचे  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये दर्यापूर येथे सभेत बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. यंदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, तर महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आपण सगळेजण महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटलो आहोत आणि पलिकडे महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

"भाजप महाराष्ट्राला लाचार करायला निघाला आहे. आता त्यांची घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे. मी बघतो कोण कापायला येतोय. भाजपचा अजेंडा बटेंगे तो कटेंगे  नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा आहे. आम्ही लुटू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही. माझा महाराष्ट्र मी स्वावलंबी आणि सर्वोत्तम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"आपल्या सरकारचं काय वाईट चाललं होतं. पाच वर्ष तरी पूर्ण करू द्यायची होती. त्यानंतर मी काय वाईट करत होतो ते बोंबलून सांगायचं होतं. अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली होती. ती कर्जमुक्ती केल्यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन मी शो केला नाही. कारण मी तुम्हाला जे कर्जमुक्त केलं. ते तुमच्यावर उपकार नव्हते केले तर मी माझं कर्तव्य पार पाडलं होतं. कमीतकमी त्रासात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी कधीच अहंकराने शेखी मिरवली नव्हती. मी खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हतं केलं," असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

"मी कधी हे मिरवून सांगितलं नाही. आज ज्यांचं हे सुरु आहे हे सगळे भाऊ.  एक देवाभाऊ. एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ. यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झाली आहे. पण एका बाबत यांची एकी झाली आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. आता निवडणुकीमुळे यांना बहीणींवर प्रेम आलं आहे. पण महिलांच्या सुरक्षेचे काय?," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४daryapur-acदर्यापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे