शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:16 IST

तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले.

- गोपाल डहाकेमोर्शी (अमरावती) : तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. लग्नानंतर मात्र जातीचा, रूपाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे तीन आठवड्यांतच तिच्या लग्नाचा विस्कोट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मला नांदायचे आहे, अशी मागणी तिने मोर्शी पोलिसांकडे केली आहे.धामणगाव गढी येथील १९ वर्षीय ऐश्वर्या (कल्पनिक नाव) चे फेसबूकवर मोर्शी शहरातील दुर्गानगर येथील रहिवासी अभिजित सुधाकर ठाकरे (२९) याच्याशी ११ महिन्यांपूर्वी मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यातील भेद गळून पडले. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. तो जुमानत नसल्याचे पाहून मोर्शी पोलीस ठाणे गाठले. हे समजताच तिची मनधरणी करीत त्याने पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात लग्न केले. मात्र, त्याच वेळी १७ महिने आईकडे राहण्याची लेखी अट तिच्याकडून १०० रुपयांच्या मुद्रांकावर घेतली. एवढेच नव्हे तर तिने नकार देताच अभिजितने शिवीगाळ करीत थप्पड लगावल्या आणि पट्ट्याने मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती धामणगावला निघून गेली. इकडे अभिजितने आईच्या कानावर सदर प्रकार घालताच ठाकरे कुटुंबीयांचे धाबे दणाणले. त्याची आई माजी भाजप तालुकाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव आणला गेला. याशिवाय मुलगी खाटीक, तर अभिजित हा कुणबी समाजाचा. त्यामुळे हे प्रकरण जातीय वळणावर गेले. अभिजितला फितवून हे लग्न मोडायचेच, असा चंग ठाकरे कुटुंबीयांनी केला होता. याची भनक मुलीला पडताच तिने १८ मे रोजी तडक दुर्गानगर गाठले. दरम्यानच्या काळात अभिजित पसार झाला, तर सासू-सासरे घरात घेण्यास तयार नसल्याने तिने ठाकरे कुटुंबाच्या घरासमोर डेरा टाकला आहे. १ व ३ जून रोजी भर पावसात ती तेथेच होती. मला माझ्या नवऱ्यासोबत नांदायचे आहे, अशी तिची एकमेव मागणी आहे.दरम्यान, तीन आठवड्यातच लग्न मोडीत निघालेल्या या युवतीने १ जून रोजी पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध शिवीगाळ व शारीरिक-मानसिक छळ करून त्रास दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाकडे मोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.मला नांदायचे आहेमला माझ्या आई-वडिलांनी या प्रकरणानंतर घराबाहेर काढले आहे. अभिजितशी कायदेशीर लग्न झाले आहे आणि त्याच्यासोबत संसार करायचा आहे. पोलीस तरी मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा ऐश्वर्याने सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

टॅग्स :Facebookफेसबुक