शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:16 IST

तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले.

- गोपाल डहाकेमोर्शी (अमरावती) : तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. लग्नानंतर मात्र जातीचा, रूपाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे तीन आठवड्यांतच तिच्या लग्नाचा विस्कोट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मला नांदायचे आहे, अशी मागणी तिने मोर्शी पोलिसांकडे केली आहे.धामणगाव गढी येथील १९ वर्षीय ऐश्वर्या (कल्पनिक नाव) चे फेसबूकवर मोर्शी शहरातील दुर्गानगर येथील रहिवासी अभिजित सुधाकर ठाकरे (२९) याच्याशी ११ महिन्यांपूर्वी मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यातील भेद गळून पडले. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. तो जुमानत नसल्याचे पाहून मोर्शी पोलीस ठाणे गाठले. हे समजताच तिची मनधरणी करीत त्याने पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात लग्न केले. मात्र, त्याच वेळी १७ महिने आईकडे राहण्याची लेखी अट तिच्याकडून १०० रुपयांच्या मुद्रांकावर घेतली. एवढेच नव्हे तर तिने नकार देताच अभिजितने शिवीगाळ करीत थप्पड लगावल्या आणि पट्ट्याने मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती धामणगावला निघून गेली. इकडे अभिजितने आईच्या कानावर सदर प्रकार घालताच ठाकरे कुटुंबीयांचे धाबे दणाणले. त्याची आई माजी भाजप तालुकाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव आणला गेला. याशिवाय मुलगी खाटीक, तर अभिजित हा कुणबी समाजाचा. त्यामुळे हे प्रकरण जातीय वळणावर गेले. अभिजितला फितवून हे लग्न मोडायचेच, असा चंग ठाकरे कुटुंबीयांनी केला होता. याची भनक मुलीला पडताच तिने १८ मे रोजी तडक दुर्गानगर गाठले. दरम्यानच्या काळात अभिजित पसार झाला, तर सासू-सासरे घरात घेण्यास तयार नसल्याने तिने ठाकरे कुटुंबाच्या घरासमोर डेरा टाकला आहे. १ व ३ जून रोजी भर पावसात ती तेथेच होती. मला माझ्या नवऱ्यासोबत नांदायचे आहे, अशी तिची एकमेव मागणी आहे.दरम्यान, तीन आठवड्यातच लग्न मोडीत निघालेल्या या युवतीने १ जून रोजी पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध शिवीगाळ व शारीरिक-मानसिक छळ करून त्रास दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाकडे मोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.मला नांदायचे आहेमला माझ्या आई-वडिलांनी या प्रकरणानंतर घराबाहेर काढले आहे. अभिजितशी कायदेशीर लग्न झाले आहे आणि त्याच्यासोबत संसार करायचा आहे. पोलीस तरी मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा ऐश्वर्याने सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

टॅग्स :Facebookफेसबुक