शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वॉटस्अपमुळे मिळाला हरवलेला चिमुकला; दिवाळीत उजळले आनंददीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 20:55 IST

Amravati News boy missing दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या. व्हॉट्सअपवरील माहितीच्या आधारे या हरविलेल्या चिमुकल्याचा शोध लागला.धोतरखेडा येथील प्रेम संजू काकडे (२ वर्ष) हा आजीसोबत शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी परतवाड्यातील गुजरी बाजारात आला होता. दरम्यान आजीच्या हातातून निसटला आणि गर्दीत दिसेनासा झाला. शोधूनही तो सापडला नव्हता.प्रेमचे वडील संजू काकडे (रा. धोतरखेडा) यांनी धोतरखेड्याचे पोलीस पाटील सुरेश कोगदे यांच्या मदतीने परतवाडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस शिपाई आशिष भुंते, पोलीस पाटील सुरेश कोगदे, प्रेमचे वडील संजू काकडेसह नातेवाईकांनी हरविलेल्या प्रेमचा मध्यप्रदेशसह लगतच्या परिसरात शोध घेतला. पण, आठ दिवसांपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.दरम्यान सुरेश कोकदे यांनी पोलीस पाटलांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर फोटोसह हरविलेल्या प्रेमची माहिती टाकली. पोलिसांनीही शोधपत्रक जारी केले. अखेर प्रेमची माहिती मिळाली आणि दिवाळी व बालकदिनी तो घरी पोहचता झाला. अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरणालगतच्या भोपापूर येथून दिवाळीच्या दिवशी पालक व पोलीस पाटलांसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.६ नोव्हेंबरला प्रेम नामक चिमुकला जैतादेही येथील एका महिलेला परतवाडा पोष्ट आॅफीस चिखलदरा स्टॉपवरील आॅटो स्टॉपवर सायंकाळी रडताना दिसला. त्याला त्या महिलेने घरी नेले. त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. ज्याचा असेल तो शोधत शोधत घ्यायला येईलच. या आशेवर असतानाच दारसिंभेचा साळा राजेश जामुनकर (रा. जैतादेही) याला ही माहिती मिळाली. त्या आधारे दरसिंभे याने त्या मुलाला आपल्या भोपापूर येथील मुलीकडे नेले. तेथून त्याची माहिती धोतरखेड्याला पोहचविली व हरवलेला प्रेम आपल्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहचता झाला.ऐन दिवाळीच्या तोंडावर मुलगा हरवल्याचे दु:ख शब्दापलीकडचे असतानाच दिवाळीच्या दिवशी तो सुखरूप घरी परतल्याचा आनंद कुटुंबीयांसाठी गगनभर ठरले.हरवलेल्या मुलाला परतवाड्यातून आपल्या घरी नेताना किंवा निदान दुसऱ्या दिवशी तरी त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी होती. आठ दिवस गावपातळीवर पोलीस पाटील, सरपंच यांनाही माहिती दिली नाही, हे योग्य नाही. पण बालकदिनी त्याला सुखरुप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करता आले. शेवट अखेर गोड झाला.- सुरेश कोगदे,पोलीस पाटील, धोतरखेडा, ता. अचलपूर.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप