शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

हरविलेले २० लाखांचे १०४ मोबाईल मूळ मालकांना केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:15 IST

अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या १० ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या नोंदी असलेले २० लाखांचे महागडे १०४ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास ...

अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या १० ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या नोंदी असलेले २० लाखांचे महागडे १०४ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास करून शोधून काढले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते सोमवारी मूळ मालकांना ते परत करण्यात आले. मोबाईल परत मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

मोबाईल हरविल्याच्या तक्रारी विविध ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह, शहर सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश ताले, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस अंमलदार सचिन भोयर, मयूर बोरेकर, पंकज गाडगे, प्रशांत मोहोड यांनी संबंधित मोबाईलबाबत तांत्रिक तपास करून १२ लाखांचे १०४ मोबाईल शोध घेण्यात यश मिळविले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते मूळ मालकांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांना मोबाईल परत देण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त विक्रम साळी यांचीही उपस्थिती होती.

बॉक्स:

ॲप्सबाबत बाळगा सावधगिरीपोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर, गुगल सर्च फसवणूक, ओएलएलक्स फ्रॉड, रिमोट कंट्रोल ॲप्स, क्यूआर कोड फ्रॉड, यूपीआय फ्रॉड याबाबत सविस्तर माहिती देत, त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.

बॉक्स:

ओटीपी देऊ नका

सायबर गुन्हेगार हे आपल्याला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्ड डिटेल्स, ओटीपी विचारून फसवणूक करतात. त्यामुळे कुणालाही बँक खाते, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका, आलेला ओटीपी सांगू नका, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले.