शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पिकांनी टाकल्या माना, सोयाबीन करपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 30, 2023 18:16 IST

ऑगस्ट महिन्यात सरासरी २ ते ६ दिवस तुरळक पाऊस : जुलैतील अतिवृष्टी, ७२ हजार हेक्टर बाधित

अमरावती : जुलै महिन्याच्या अखेरपासून पावसाचा ताण आहे. या महिनाभरात पावसाचे केवळ दोन ते सहा दिवस राहिले आहेत. यादरम्यान तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडल्याने वाढीच्या अवस्थेतील पिकांना ओढ लागली व तापमान वाढल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. सर्वांत कमी पाऊस असलेल्या दर्यापूर व अंजनगाव तालुक्यात बिकट स्थिती ओढावली आहे.

यंदाच्या खरिपात मान्सून तीन आठवडे विलंबाने आला. त्यानंतरही खंड पडला. फक्त जुलै महिन्यात पावसाची नोंद झाली. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान ६९९.३ मिमी. पावसाची सरासरी आवश्यकता असताना प्रत्यक्षात ४२९.५ मिमी. पावसाची नोंद झाली. ही ६१.४ टक्केवारी आहे. म्हणजेच पावसाचे ७५ दिवस संपले असताना ३९ टक्के पावसाची तूट आहे.

सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. यामध्ये सोयाबीन बहरावर, तर कपाशी पात्या व फुलांवर आहे. अशा परिस्थितीत पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असताना पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व पिकांनी माना टाकल्या आहेत, अशीच स्थिती चार दिवस राहिल्यास बहुतेक भागातील खरिपाचा हंगाम हातचा जाण्याची स्थिती ओढावणार आहे.

शेतीचा झाला ‘पंचनामा’, हवी ७५ कोटींची मदत

मान्सूलला तीन आठवड्यांचा विलंब लागला तरी जुलैमध्ये दमदार कमबॅक केल्याने तब्बल ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या बाधित पिकांचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये ७२,०७२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान व ५२ हेक्टरमधील पिके खरडून गेल्याने २४.३८ लाख, अशी एकूण ७४.६४ कोटींची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी शासनाकडे केली.

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून सर्वाधिक ५३ कोटींचे नुकसान जिरायती पिकांचे झालेले आहे. याशिवाय बागायती पिकांचे ६२.२८ लाख तर फळपिकांचे २०.६१ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आहे. विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाला अहवाल पाठविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCropपीकRainपाऊसCrop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती