शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

पिकांनी टाकल्या माना, सोयाबीन करपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 30, 2023 18:16 IST

ऑगस्ट महिन्यात सरासरी २ ते ६ दिवस तुरळक पाऊस : जुलैतील अतिवृष्टी, ७२ हजार हेक्टर बाधित

अमरावती : जुलै महिन्याच्या अखेरपासून पावसाचा ताण आहे. या महिनाभरात पावसाचे केवळ दोन ते सहा दिवस राहिले आहेत. यादरम्यान तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडल्याने वाढीच्या अवस्थेतील पिकांना ओढ लागली व तापमान वाढल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. सर्वांत कमी पाऊस असलेल्या दर्यापूर व अंजनगाव तालुक्यात बिकट स्थिती ओढावली आहे.

यंदाच्या खरिपात मान्सून तीन आठवडे विलंबाने आला. त्यानंतरही खंड पडला. फक्त जुलै महिन्यात पावसाची नोंद झाली. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान ६९९.३ मिमी. पावसाची सरासरी आवश्यकता असताना प्रत्यक्षात ४२९.५ मिमी. पावसाची नोंद झाली. ही ६१.४ टक्केवारी आहे. म्हणजेच पावसाचे ७५ दिवस संपले असताना ३९ टक्के पावसाची तूट आहे.

सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. यामध्ये सोयाबीन बहरावर, तर कपाशी पात्या व फुलांवर आहे. अशा परिस्थितीत पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असताना पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व पिकांनी माना टाकल्या आहेत, अशीच स्थिती चार दिवस राहिल्यास बहुतेक भागातील खरिपाचा हंगाम हातचा जाण्याची स्थिती ओढावणार आहे.

शेतीचा झाला ‘पंचनामा’, हवी ७५ कोटींची मदत

मान्सूलला तीन आठवड्यांचा विलंब लागला तरी जुलैमध्ये दमदार कमबॅक केल्याने तब्बल ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या बाधित पिकांचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये ७२,०७२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान व ५२ हेक्टरमधील पिके खरडून गेल्याने २४.३८ लाख, अशी एकूण ७४.६४ कोटींची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी शासनाकडे केली.

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून सर्वाधिक ५३ कोटींचे नुकसान जिरायती पिकांचे झालेले आहे. याशिवाय बागायती पिकांचे ६२.२८ लाख तर फळपिकांचे २०.६१ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आहे. विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाला अहवाल पाठविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCropपीकRainपाऊसCrop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती