शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आंबियाची फळगळ कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:27 IST

जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे विदर्भाचा कॅलीफोर्निया अशी ओळख असलेल्या राज्याचे कृषिमंत्र्यांच्या मोर्शी मतदारसंघासह अन्य चार तालुक्यांतील संत्राउत्पादक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाला उशिरा जाग : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात संत्रा उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे विदर्भाचा कॅलीफोर्निया अशी ओळख असलेल्या राज्याचे कृषिमंत्र्यांच्या मोर्शी मतदारसंघासह अन्य चार तालुक्यांतील संत्राउत्पादक संकटात सापडला आहे.यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असताना संत्राउत्पादकांनी टँकरने पाणी आणून बागा जगविल्या. यामध्ये ज्या बागा वाचल्या त्यांच्या आंबिया बहराची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ही फळगळ नत्राच्या कमतरतेमुळेही होत असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. फळांच्या वाढीसाठी नत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नत्रामुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते तसेच आॅक्सिझन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया अमोनिअम या संयुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरीत्या युरियाची फवारणीद्वारे वाढविता येते. कर्बोदकांच्या अभावामुळे पाने, फुले व फळे यांच्यात पेशीक्षय होतो. पावसाळयात होणाºया सततच्या पावसाच्या पाण्याने जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायूचा कमी प्रमाणात पुरवठा होतो. बोट्रिओडिप्लोडिआ, कलेटोट्रिकम व काहिअंशी आॅल्टरनेरिआ या बुरशीमुळे फळांची गळती होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर रोग जास्त पसरतो. तसेच काळी माशी, मावा-तुडतुडे यांच्या शरीरातील निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशी वाढून पेशीक्षय होऊन फळगळ होते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे. साधारणपणे एका फळाची पूर्ण वाढ होण्यास जवळपास ४० पाने असावी लागतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली.अचलपूर तहसीलदारांना निवेदनपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अज्ञात रोगाने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक मोठ्या प्रमाणात संत्रा फळांची गळती होत असल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी दीपक सुरेश पाटील, राहुल नंदकुमार तट्टे, सुधीर सुदाम चरोडे, शांताबाई सुधाकर चरोडे, रवींद्र पुंडलिकराव निकम, अनिल चरोडेसह परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.असे करावे व्यवस्थापनकृत्रिम जैवसंजीवक नॅफथॅलीन (एन.ए.ए.) वनस्पतीतील अंतर्गत आॅक्सिझन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. बुरशीजन्य रोगांमुळे होणारी फळगळ कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाच्या फवारण्यामुळे रोखू शकतो. नत्राची कमतरता युरियाच्या फवारणीमुळे दूर करू शकतो. फळगळ रोखण्यासाठी तातडीने एन.ए.ए. किंवा २४-डी १५ पीपीएम १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम १०० लिटर पाण्यात फवारणी करावी. फळगळ निंयत्रणात न आल्यास आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात ही फवारणी करावी.अशी घ्यावी काळजीझाडावर भरपूर पालवी राहावी यासाठी अन्नद्रव्यांचा शिफारसानुसार वापर करावा. फळांच्या तोडणीनंतर लगेच वाळलेल्या फांद्या छाटून टाकावी. पावसाळ्यात बगिच्यात पाणी साचू देऊ नये. बगिच्यातील जास्तीचे पाणी उताराच्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० सेमी खोल, ३० सेमीखालची रुंदी व ४५ सेमी वरची रुंदी असलेले चर खोदावेत. गळलेली फळे तातडीने उचलून दूर फेकावीत. नॅफथॅलीन सेटिन सिड एनएए किंवा २४-डी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे ४०-५० मिली अल्कोहोल किंवा सिटोनमध्ये विरघळून घ्यावीत.