शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांना ‘अ‍ॅप’चे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:31 IST

आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अ‍ॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अ‍ॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसर्व उमेदवारी अर्ज ऑफलाइन ‘सुगम’, ‘सुविधा’, ‘समाधान’चा वापरच नाही

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अ‍ॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अ‍ॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणे सोयीचे व्हावे, यासाठीही अ‍ॅप आहे. मात्र, या अ‍ॅपवर आतापर्यंत एकही तक्रार पुराव्यानिशी आलेली नाही.प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी व यामध्ये तासन्तास जाणारा वेळ वाचावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे यावेळी प्रथमच अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना घरबसल्या उमेदवारी अर्ज करता यावा, यासाठी समाधान अ‍ॅप निर्माण करण्यात आले. हे ऑप आता नॅशनल गिव्हीनन्स सर्व्हिस पोर्टल (एनजीएसपी) या नावाने आहे. मात्र, या अ‍ॅपवर एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अत्यंत कमी दिवसांत लाखो मतदारांपर्यत उमेदवाराला जायचे असल्याने त्याचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आता निवडणुका, उमेदवार, आयोग अन् यंत्रणादेखील हायटेक होत असल्यान निवडणूक कार्यालयापर्यंत येण्याची पायपीटच नको व त्याद्वारे होणारा उमेदवारांचा लाखो रुपयांचा खर्च टाळता यावा, यासाठी आयोगाद्वारे ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आली. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या सहाही दिवसांत एकाही उमेदवाराने या हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. त्यापेक्षा स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.निवडणूक म्हटले की, कमी दिवसात अधिकाधिक कामे करण्याकडे यंत्रणेसह उमेदवारांचा कल असतो हे हेरून आयोगाने यावेळी ‘सुविधा’ या अ‍ॅपद्वारे उमेदवारांना सुविधा दिल्यात.हे अ‍ॅप म्हणजे उमेदवारांसाठी जनू एक खिडकीच आहे. सर्व विभागाशी सबंधित सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी हे अ‍ॅ प महत्वपूर्ण आहे. या अ‍ॅपवर सभेसंदर्भात परवानगी मिळत असतांना एकाही उमेदवाराद्वारा या अ‍ॅपचा वापर करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे सुगम अ‍ॅपवर निवडणूक वाहनासंबंधी परवानगी मिळते. मात्र, सद्यस्थितीत एकाही वाहनाची परवानगी या अ‍ॅपद्वारे मागण्यात आलेली नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

‘सी व्हिजिल’चा वापरच नाहीनिवडणूक प्रक्रियेत जर मतदारांना उमेदवारांना प्रलोभने दिली जात असतील, तर आदर्श आचारसंहितेचा भंग होतो. राजकारण्यांशी विरोध नको म्हणून अनेकदा नागरिक तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे नाव न जाहीर करता, तक्रार करता येण्यासाठी यावेळी आयोगाद्वारे सी व्हिजिल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपवर आतापर्यंत १२ तक्रारी करण्यात आल्यात. यापैकी तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक काळात महत्त्वपूर्ण मतदार अन् उमेदवारांनी अ‍ॅपचे गांभीर्य जाणले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

निवडणूक प्रक्रियेत सुलभता यावी, यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच एकाच ठिकाणी परवानग्या मिळाव्यात व याद्वारे मतदार व उमेदवार यांना सर्वतोपरी साहाय्य व्हावे, यासाठी अ‍ॅप उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा वापर मतदार व उमेदवारांना करण्याबाबत सूचना निवडणूक विभागाने केल्या आहेत.- अरुण रणवीर, जिल्हा सूचना,विज्ञान अधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक