शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांना ‘अ‍ॅप’चे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:31 IST

आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अ‍ॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अ‍ॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसर्व उमेदवारी अर्ज ऑफलाइन ‘सुगम’, ‘सुविधा’, ‘समाधान’चा वापरच नाही

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अ‍ॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अ‍ॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणे सोयीचे व्हावे, यासाठीही अ‍ॅप आहे. मात्र, या अ‍ॅपवर आतापर्यंत एकही तक्रार पुराव्यानिशी आलेली नाही.प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी व यामध्ये तासन्तास जाणारा वेळ वाचावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे यावेळी प्रथमच अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना घरबसल्या उमेदवारी अर्ज करता यावा, यासाठी समाधान अ‍ॅप निर्माण करण्यात आले. हे ऑप आता नॅशनल गिव्हीनन्स सर्व्हिस पोर्टल (एनजीएसपी) या नावाने आहे. मात्र, या अ‍ॅपवर एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अत्यंत कमी दिवसांत लाखो मतदारांपर्यत उमेदवाराला जायचे असल्याने त्याचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आता निवडणुका, उमेदवार, आयोग अन् यंत्रणादेखील हायटेक होत असल्यान निवडणूक कार्यालयापर्यंत येण्याची पायपीटच नको व त्याद्वारे होणारा उमेदवारांचा लाखो रुपयांचा खर्च टाळता यावा, यासाठी आयोगाद्वारे ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आली. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या सहाही दिवसांत एकाही उमेदवाराने या हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. त्यापेक्षा स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.निवडणूक म्हटले की, कमी दिवसात अधिकाधिक कामे करण्याकडे यंत्रणेसह उमेदवारांचा कल असतो हे हेरून आयोगाने यावेळी ‘सुविधा’ या अ‍ॅपद्वारे उमेदवारांना सुविधा दिल्यात.हे अ‍ॅप म्हणजे उमेदवारांसाठी जनू एक खिडकीच आहे. सर्व विभागाशी सबंधित सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी हे अ‍ॅ प महत्वपूर्ण आहे. या अ‍ॅपवर सभेसंदर्भात परवानगी मिळत असतांना एकाही उमेदवाराद्वारा या अ‍ॅपचा वापर करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे सुगम अ‍ॅपवर निवडणूक वाहनासंबंधी परवानगी मिळते. मात्र, सद्यस्थितीत एकाही वाहनाची परवानगी या अ‍ॅपद्वारे मागण्यात आलेली नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

‘सी व्हिजिल’चा वापरच नाहीनिवडणूक प्रक्रियेत जर मतदारांना उमेदवारांना प्रलोभने दिली जात असतील, तर आदर्श आचारसंहितेचा भंग होतो. राजकारण्यांशी विरोध नको म्हणून अनेकदा नागरिक तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे नाव न जाहीर करता, तक्रार करता येण्यासाठी यावेळी आयोगाद्वारे सी व्हिजिल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपवर आतापर्यंत १२ तक्रारी करण्यात आल्यात. यापैकी तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक काळात महत्त्वपूर्ण मतदार अन् उमेदवारांनी अ‍ॅपचे गांभीर्य जाणले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

निवडणूक प्रक्रियेत सुलभता यावी, यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच एकाच ठिकाणी परवानग्या मिळाव्यात व याद्वारे मतदार व उमेदवार यांना सर्वतोपरी साहाय्य व्हावे, यासाठी अ‍ॅप उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा वापर मतदार व उमेदवारांना करण्याबाबत सूचना निवडणूक विभागाने केल्या आहेत.- अरुण रणवीर, जिल्हा सूचना,विज्ञान अधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक