शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

लॉकडाऊन इफेक्ट; हवेची गुणवत्ता सुधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आकडेवारी प्राप्त केली.

ठळक मुद्दे‘एएक्यूएम’चा अहवाल : प्रदूषणात घट, आरएसपीएमच्या प्रमाणातही कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा रहिवासी, औद्योगिक व वाणिज्यिक क्षेत्रात प्रदूषणाचे पातळीत घट झाली आहे. एनओएक्स, एसओटू व आरएसपीएमच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याने महापालिका क्षेत्रात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची बाब ‘एएक्यूएम’ (अ‍ॅम्बीएंन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग) च्या आकडेवारी व अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. यंदा चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. याविषयीचा अहवाल महापालिकेला सादर झालेला आहे.सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आकडेवारी प्राप्त केली. त्याअनुषंगाने हा अहवाल तयार करून सभागृहासमोर ठेवण्यात आला होता.एएक्यूएमच्या वार्षिक वायुप्रदूषण अहवालानुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १३.०५ व एसओटूचे ११.१८ आढळले. हे प्रमाण प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे व आरएसपीएमचे प्रमाण ६९.६४ आढळले. हे प्रमाण अनुज्ञेय पातळी १०० पेक्षा कमी आढळले आहे. सन २०१८-१९ मध्ये हे प्रमाण ७४.७१ होते. औद्योगिक क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १३.८३ व एसओटूचे प्रमाण १२.२८ आढळले. प्रदूषण पातळीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाण ८५.८३ आढळले हे अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त असले तरी गतवर्षी हे प्रमाण १०८.९१ होते. व्यापारी क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १४.७१ व एसओटूचे प्रमाण १३.४१ ऐवढे आहे. हे प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे.आरएसपीएमचे प्रमाण ९३.३० आहे, हे अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्त असले तरी गतवर्षी असलेल्या ११८.७६ पेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.कारवाईचे अधिकार पोलिसांनाशहरातील ध्वनिप्रदूषणासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास कारवाईचे अधिकार पोलीस विभागाला आहेत. शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये अशी ५८१ शांतता क्षेत्रे घोषित केल्याची माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी दिली.महापालिका क्षेत्रात वार्षिक वायुप्रदूषण स्थितीरहिवासी क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ६५.५० म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी तसेच एनओएक्स १२.७० व एसओटूचे प्रमाण १२.१५ म्हणजेच अनुज्ञेय प्रमाण ८० पेक्षा कमी आहे.औद्योगिक क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण ८७.६० म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी तसेच एबओएक्स १२.४० व एसओटूचे प्रमाण १२.६८ हे अनुज्ञेय पातळी ८० पेक्षा कमी आहे.व्यापारी क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण ८९.१५ म्हणजे अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त तसेच एनओएक्स ११.९० व एसओटूचे प्रमाण १२.०५ ही अनुज्ञेय पातळी ८० पेक्षा कमी आहे.घनकचरा अन् सांडपाणी व्यवस्थापनसुकळी कंपोस्ट डेपो, अकोली बायपास व कोंडेश्वर मार्गावर बडनेरा येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी ३८ कोटींचा निधी अपेक्षित आहे. शहरातील दैंनदिन घनकचऱ्यावर येथे विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण