शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वर्धा सीमेवर दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

धामणगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन हजार लोकवस्तीचे गाव विटाळा येथपासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते. संपूर्ण राज्यात दारूचे दुकाने बंद असताना या गावात देशी, विदेशी, गावरान दारूची खुलेआम विक्री केली जात असल्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. विटाळा परिसरात देशी दारू, बीअर सहज उपलब्ध होते. बिल देण्यात येत नाही. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात विटाळा गावपरिसरात देशी, विदेशी दारू खुलेआम विक्री जात असल्याच्या तक्रारी राज्य शासनापर्यंत पोहोचल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बीअर बार व दारू दुकानांना लावलेल्या सीलवर प्रशचिन्ह लागले आहेत.

ठळक मुद्देदोन्ही जिल्ह्यांची हद्द खुली। दोन किमी प्रवास, जिल्हाबंदी कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे/मंगरूळ दस्तगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. दोन जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या. मात्र, अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या मध्यंतरी असलेली हद्द बंद करण्यात न आल्याने त्या सीमेवर दारूचा महापूर आला आहे. तब्बल दोन किलोमीटरचा पायी प्रवास करून तळीराम दारू मिळवित आहेत.धामणगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन हजार लोकवस्तीचे गाव विटाळा येथपासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते. संपूर्ण राज्यात दारूचे दुकाने बंद असताना या गावात देशी, विदेशी, गावरान दारूची खुलेआम विक्री केली जात असल्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. विटाळा परिसरात देशी दारू, बीअर सहज उपलब्ध होते. बिल देण्यात येत नाही. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात विटाळा गावपरिसरात देशी, विदेशी दारू खुलेआम विक्री जात असल्याच्या तक्रारी राज्य शासनापर्यंत पोहोचल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बीअर बार व दारू दुकानांना लावलेल्या सीलवर प्रशचिन्ह लागले आहेत. याच परिसरात वर्धा नदीच्या तिरावर गावरानी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जाते. गावरानी दारूची विक्री होत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा सवाल विटाळा ग्रामस्थांनी लेखी तक्रारीतून विचारला आहे.पुलगाव ते विटाळा या रस्त्या दरम्यान असलेल्या वर्धा नदीच्या सपाट पुलावर जिल्हाबंदी पाळली जात नाही. त्यामुळे पुलगाव परिसरातील अनेक तळीराम दोन किलोमीटर पायी प्रवास करून अमरावती जिल्ह्यात गावरानी दारू पिण्यासाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे.मंगरूळ पोलिसांचे कानावर हातदोन जिल्ह्याच्या मध्यावर असलेली अमरावती जिल्ह्याची हद्द मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. विटाळा ग्रामस्थांनी आपल्या गावपरिसरात अवैध गावठी दारू गाळणाऱ्यांची नावे मंगरूळ दस्तगीर पोलिसांना लेखी तक्रारीत दिली होती. ती ठिकाणही दाखवली, मात्र कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे विटाळावासीयांनी तक्रार केली आहे. दारू पकडणे हे उत्पादन शुल्क विभागाचे काम असल्याचे सांगत पोलिसांनी कानावर हात ठेवले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.आमच्या गावात लॉकडाऊन पाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असताना, गावात अवैधरित्या देशी-विदेशी गावठी दारूची विक्री होत आहे. ग्रामस्थ आमच्या गावात दारू पिण्यासाठी येतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.- मंगेश ठाकरे, सरपंच, विटाळा