सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:06+5:302021-02-05T05:25:06+5:30

अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि जाहीर झालेल्या निकालानंतर गावोगावी विजयी झालेल्या उमेदवारांसह पॅनेलप्रमुखांना सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली होती. ...

Leaving Sarpanch post in seven talukas today | सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि जाहीर झालेल्या निकालानंतर गावोगावी विजयी झालेल्या उमेदवारांसह पॅनेलप्रमुखांना सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली होती. अखेर आता तो क्षण जवळ आला आहे. जिल्ह्यातील १४ पैकी ७ तालुक्यांत मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत संबंधित तहसील स्तरावर काढली जाणार आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ८४० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच आटोपली. यातील १६ ग्रामपंचायतींसह अन्य ठिकाणी एका सदस्यपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ४७७ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ५३७ ग्रामपंचातींसाठी मतदान घेण्यात आले. यात ४३९७ सदस्य निवडून आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. आरक्षण कार्यक्रमानुसार दोन टप्प्यांत ही सोडत काढली जाईल. पहिला टप्पा २ व दुसरा टप्पा ४ फेब्रुवारी रोजी आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७ तालुक्यांत मंगळवारी सोडत काढली जाईल. सोडतीची प्रक्रिया संबंधित तहसील स्तरावर राबविली जाणार आहे. यावेळी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हे राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संबंधित तहसीलदार कामकाज पाहणार आहेत.

बॉक्स

या तालुक्यात आज सोडत

अमरावती, तिवसा, चांदूर रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, चांदूर बाजार आणि धारणी या ७ तालुक्यांत २ फेब्रुवारीला, तर नांंदगाव खंडेश्र्वर, भातकुली, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि चिखलदरा या तालुक्यात ४ फेब्रुवारीला सरपंचपदाची सोडत काढली जाईल.

Web Title: Leaving Sarpanch post in seven talukas today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.