सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:50+5:302021-02-05T05:24:50+5:30

अमरावती : ग्रामीण भागातील राजकीय धुराळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ७ तालुक्यात ...

Leaving Sarpanch post in seven talukas today | सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

सात तालुक्यांत सरपंचपदाची सोडत आज

अमरावती : ग्रामीण भागातील राजकीय धुराळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ७ तालुक्यात पार पडणार आहे. संबंधित तहसील स्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांसह पॅनेलप्रमुखांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच आटोपली. त्यानंतर महत्त्वाचा टप्पा असलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची राजकीय मंडळींना उत्सुकता लागली होती. पहिल्या टप्प्यात ७ तालुक्यांतील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत २ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यानंतर आता नांदगाव खंडेश्र्वर, भातकुली, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि चिखलदरा अशा ७ तालुक्यांत गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी संबंधित तहसील कार्यालयात सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यावेळी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हूणन संबंधित तहसीलदार कामकाज पाहणार आहेत.

Web Title: Leaving Sarpanch post in seven talukas today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.