शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

लोकमत स्पेशल : तब्बल १६५ वर्षांनंतर अद्भूत योग! सन २०२० मध्ये लीप इयर व अधिकमास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 12:30 IST

हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो.

सुभाष दाभिरकर

वरूड (अमरावती) - सन २०२० मध्ये एकाच वर्षात लीप इयर (म्हणजे ३६६ दिवस) व अधिक महिना असा अद्भूत योग १६५ वर्षांनी जुळून आला आहे. टेंभुरखेडा येथील गणितज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी ही माहिती दिली. 

सन २०२० मध्ये शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक अश्विन मास सुरू होत आहे. हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस आणि ६ तास लागतात. या काळात इंग्रजी कालदर्शिकेनुसार १२ महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास ३५४ दिवसांतच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. हे अंतर तीन वर्षांनी सुमारे १ महिन्याचे होते. सौर मास व चंद्र मास यांची सांगड घालण्यासाठी आणि ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक महिन्याची व क्षय महिन्याची योजना करण्यात आलेली आहे. अतिरिक्त दिवसांचा महिना म्हणूनच याला अधिक महिना म्हटले जाते.

आषाढी एकादशीपासून चतुर्मास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या चतुर्मासाचे विशेष महत्त्व म्हणजे हा काळ यावर्षी ५ महिन्यांचा असेल. कारण अश्विन महिना यावर्षी पुरुषोत्तम म्हणजेच अधिक असेल. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध विधीचा मानला जातो. पितृ पंधरवडा हा पूर्वजांच्या स्मरणाचा काळ मानला जातो. यंदा सर्वपित्री अमावस्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे, हाही मोठा अद्भूत योग आहे.

सन २०२० मध्ये बुधवार, २ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात झाली. गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावशा म्हणजेच सर्वपित्री अमावशेची सांगता होताच दुसऱ्या दिवशी घटस्थापनेस प्रारंभ होते. अधिकमासाला पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, संसर्प मास संबोधतात. २६ ऑक्टोबर रोजी विजयादशमी, १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यानंतर चातुर्मास समाप्त होईल. चतुर्मास प्रारंभ झाल्यानंतर विवाह, मुंडन, मुंज, कान टोचणे यासारखी शास्त्रानुसार मंगलकार्य टाळली जातात. या चातुर्मासात उपवास आणि साधना यांना अधिक महत्त्व असते. चातुर्मासाचा काळ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला समाप्त होतो.

टॅग्स :Earthपृथ्वी