शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

‘विकेल ते पिकेल’ अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी वलगाव : बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या ...

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी

वलगाव : बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून अमरावती तालुक्यातील रेवसा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी उपलब्ध देण्यात आला.

बुधवारी या अभियानाला प्रारंभ झाला. ते जिल्हाभर यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे भाजीपाला व फळे विक्री केंद्राचे उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील तसेच ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरामध्ये उपलब्ध होणार असल्याचे यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे म्हणाल्या. भाजीपाला स्टॉलवर उपस्थित शेतकरी बांधवांना ओळखपत्र राहणार आहे.

अमरावती तालुका कृषी अधिकारी के.एम. हतागळे, मंडळ कृषी अधिकारी नीता कवाणे, (मंडळ कृषी अधिकारी), रोहिणी उगले, अविनाश पांडे, सोनाली पंडित, रूपाली चौधरी, व्ही.व्ही. वानखडे आदी याप्रसंगी उपिस्थत होते.