शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

मध्यवर्ती स्थानकाहून धावणार ‘लालपरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

ठळक मुद्देआजपासून प्रारंभ : चार महिन्यांपासून वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जीवनवाहिनी ‘लालपरी’ अमरावती व बडनेरा बस स्थानकाहून ५ ऑगस्टपासून प्रवासी वाहतूक करणार आहे. कोरोनामुळे चार महिन्यांपासून शहरातून बसफेरी बाहेर गेलेली नाही.लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या बसफेºया सोडल्या जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यासंबंधी परिपत्रकही त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना जारी केले. परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये २२ मेपासून बस धावत आहेत. त्यानंतर आता अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व बडनेरा आगारातून बसफेऱ्यांबाबत नियोजन करण्यात आलेए. प्रवाशाचा प्रतिसाद पाहून या बसेस तालुक्यापर्यत सोडल्या जाणार आहेत. याला प्रतिसाद मिळाल्यास बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांचीच वाहतूक केली जाणार आहे. याकरिता आवश्यक चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत. बसफेऱ्या सुरू होणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चार महिन्यानंतर प्रवासी वाहतुकीचे अधिकृत साधन नागरिकांना उपलब्ध झाले. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.प्रवाशांची ने-आण होती बंदअमरावती व बडनेरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने महापालिकेचा हा परिसर ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला होता. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून दोन्ही आगार व शहरातून एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली होती. आता मात्र या बस स्थानकाहून बस धावणार आहेत.दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील सहा आगारांमधून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती व बडनेरा आगार व शहरातून बस बंद होत्या. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कोरानासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करून दोन्ही आगारांतून बस फेºया सोडल्या जातील.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक

टॅग्स :state transportएसटी