शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती स्थानकाहून धावणार ‘लालपरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

ठळक मुद्देआजपासून प्रारंभ : चार महिन्यांपासून वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जीवनवाहिनी ‘लालपरी’ अमरावती व बडनेरा बस स्थानकाहून ५ ऑगस्टपासून प्रवासी वाहतूक करणार आहे. कोरोनामुळे चार महिन्यांपासून शहरातून बसफेरी बाहेर गेलेली नाही.लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या बसफेºया सोडल्या जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यासंबंधी परिपत्रकही त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना जारी केले. परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये २२ मेपासून बस धावत आहेत. त्यानंतर आता अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व बडनेरा आगारातून बसफेऱ्यांबाबत नियोजन करण्यात आलेए. प्रवाशाचा प्रतिसाद पाहून या बसेस तालुक्यापर्यत सोडल्या जाणार आहेत. याला प्रतिसाद मिळाल्यास बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांचीच वाहतूक केली जाणार आहे. याकरिता आवश्यक चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत. बसफेऱ्या सुरू होणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चार महिन्यानंतर प्रवासी वाहतुकीचे अधिकृत साधन नागरिकांना उपलब्ध झाले. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.प्रवाशांची ने-आण होती बंदअमरावती व बडनेरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने महापालिकेचा हा परिसर ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला होता. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून दोन्ही आगार व शहरातून एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली होती. आता मात्र या बस स्थानकाहून बस धावणार आहेत.दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील सहा आगारांमधून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती व बडनेरा आगार व शहरातून बस बंद होत्या. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कोरानासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करून दोन्ही आगारांतून बस फेºया सोडल्या जातील.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक

टॅग्स :state transportएसटी