शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पर्यटनासोबतच लक्ष्मीची पावले

By admin | Updated: January 3, 2016 00:37 IST

वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, ....

केसरी पाटील : ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उलगडला प्रवास अमरावती : वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, अशा शब्दांत केसरी टुर्सचे संस्थापक आणि चेअरपर्सन केसरी पाटील यांनी जीवनपदर उलगडले. भारतातील आणि परदेशातील रंजक प्रेरक, प्रेक्षणीय तसेच रमणीय स्थळांचे दर्शन घडविताना त्यांनी व्यवसाय काटेकोरपणा आपुलकीने जपला. शिस्तबद्ध, परिपूर्ण नियोजन आणि नावीन्यपूर्ण कल्पकतेचा संयोग घडवून पर्यटन उद्योगात ‘केसरी’ या नावाला वलय प्राप्त झाल्याचे केसरी पाटील यांनी सांगितले. पर्यटन उद्योगातून मिळविलेल्या समृद्धीचा वापर समाजहितासाठी व्हावे यासाठी त्यांनी केसरी आर्ट अ‍ॅन्ड कल्चर फाऊंडेशनची स्थापनाही केली आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवसी ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात केसरी पाटील आणि उद्योजक मोहन गोरे यांनी विद्यार्थ्यांसमोर जीवनपट उलगडला. ८ जून १९८३ साली केसरी ट्रॅव्हल्स सुरू झाली. १०० चौरस फुटाच्या जागेत कार्यालय सुरू झाले व पुढे ‘गुडविल’च्या भरवशावर ‘एम्पायर’ उभे करण्यात आपण यशस्वी झालो. कामात देवत्व शोधण्याचा गुण आपल्यात होताच असे सांगत गरिबीला आव्हान म्हणून स्वीकारा, भाऊबंदकी हा महाराष्ट्राचा पाचवीला पुजलेला शाप आहे, असे अधोरेखित करत मेहनतीला कुठलाही पर्याय नसतो, असा गुरुमंत्र त्यांनी दिला. (प्रतिनिधी) कामाआधी यश येत नाही इंग्रजी डिक्शनरीमध्ये ‘वर्क’ आधी ‘सक्सेस’ येत असले तरी प्रत्यक्षात कामातही यश येत नाही, काम करून दाखवावेच लागते, अशा शब्दांत सुप्रसिद्ध उद्योजक मोहन गोरे यांनी यशाचा मार्ग अधोरेखित केला. १९४४ साली वडिलांच्या व्यवसायाला अवकळा आली. मात्र त्यानंतर पुढे कष्ट करून इंजिनियरिंग केले. उद्योजक म्हणून मिळविलेले यश काबाडकष्टातून मिळविले असल्याचे ते म्हणाले. गरीब नसाल तर श्रीमंत कसे व्हाल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारून उत्तरही देऊन टाकले. गुडविल महत्त्वाचे - पुसदकर ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात नितीन केळकर हे केसरी पाटील आणि मोहन गोरे यांची मुलाखत घेताना रामदास फुटाणे यांनी अमरावतीकर सोमेश्वर पुसदकर यांनाही बोलते केले. कुठल्याही व्यवसायात, समाजसेवेत, अन्य कुठल्याही क्षेत्रात ‘गुडविल’ महत्त्वाचे; लक्ष्मीची पावले इतरांच्या घरी गेलीत की ती आपल्या घरी आपोआप येतात, असे सांगत सोमेश्वर पुसदकर यांनी राजकारण आणि समाजकारणातील ‘कार्यकर्ता’ उलगडला.