शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पर्यटनासोबतच लक्ष्मीची पावले

By admin | Updated: January 3, 2016 00:37 IST

वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, ....

केसरी पाटील : ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उलगडला प्रवास अमरावती : वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, अशा शब्दांत केसरी टुर्सचे संस्थापक आणि चेअरपर्सन केसरी पाटील यांनी जीवनपदर उलगडले. भारतातील आणि परदेशातील रंजक प्रेरक, प्रेक्षणीय तसेच रमणीय स्थळांचे दर्शन घडविताना त्यांनी व्यवसाय काटेकोरपणा आपुलकीने जपला. शिस्तबद्ध, परिपूर्ण नियोजन आणि नावीन्यपूर्ण कल्पकतेचा संयोग घडवून पर्यटन उद्योगात ‘केसरी’ या नावाला वलय प्राप्त झाल्याचे केसरी पाटील यांनी सांगितले. पर्यटन उद्योगातून मिळविलेल्या समृद्धीचा वापर समाजहितासाठी व्हावे यासाठी त्यांनी केसरी आर्ट अ‍ॅन्ड कल्चर फाऊंडेशनची स्थापनाही केली आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवसी ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात केसरी पाटील आणि उद्योजक मोहन गोरे यांनी विद्यार्थ्यांसमोर जीवनपट उलगडला. ८ जून १९८३ साली केसरी ट्रॅव्हल्स सुरू झाली. १०० चौरस फुटाच्या जागेत कार्यालय सुरू झाले व पुढे ‘गुडविल’च्या भरवशावर ‘एम्पायर’ उभे करण्यात आपण यशस्वी झालो. कामात देवत्व शोधण्याचा गुण आपल्यात होताच असे सांगत गरिबीला आव्हान म्हणून स्वीकारा, भाऊबंदकी हा महाराष्ट्राचा पाचवीला पुजलेला शाप आहे, असे अधोरेखित करत मेहनतीला कुठलाही पर्याय नसतो, असा गुरुमंत्र त्यांनी दिला. (प्रतिनिधी) कामाआधी यश येत नाही इंग्रजी डिक्शनरीमध्ये ‘वर्क’ आधी ‘सक्सेस’ येत असले तरी प्रत्यक्षात कामातही यश येत नाही, काम करून दाखवावेच लागते, अशा शब्दांत सुप्रसिद्ध उद्योजक मोहन गोरे यांनी यशाचा मार्ग अधोरेखित केला. १९४४ साली वडिलांच्या व्यवसायाला अवकळा आली. मात्र त्यानंतर पुढे कष्ट करून इंजिनियरिंग केले. उद्योजक म्हणून मिळविलेले यश काबाडकष्टातून मिळविले असल्याचे ते म्हणाले. गरीब नसाल तर श्रीमंत कसे व्हाल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारून उत्तरही देऊन टाकले. गुडविल महत्त्वाचे - पुसदकर ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात नितीन केळकर हे केसरी पाटील आणि मोहन गोरे यांची मुलाखत घेताना रामदास फुटाणे यांनी अमरावतीकर सोमेश्वर पुसदकर यांनाही बोलते केले. कुठल्याही व्यवसायात, समाजसेवेत, अन्य कुठल्याही क्षेत्रात ‘गुडविल’ महत्त्वाचे; लक्ष्मीची पावले इतरांच्या घरी गेलीत की ती आपल्या घरी आपोआप येतात, असे सांगत सोमेश्वर पुसदकर यांनी राजकारण आणि समाजकारणातील ‘कार्यकर्ता’ उलगडला.