शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

ब्रिटिश राजवटीतील तलाव आजही उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

१८ तलावांपैकी काही तलाव गावाच्या अगदी नजीक असल्याने गावालाही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे त्या तलावाचा गाळ उपसल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल. याचा फायदा तलावाशेजारच्या गावांना होईल. या तलावाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील वनवैभव आबाद; हजारोच्या संख्येने वन्यप्राणी, पक्षी, वृक्षाची भागवितात तहान

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वन्यप्राण्यांच्या झुंडीला पाच-पाच किलोमीटर चालून गेल्यानंतर पाण्याची आवश्यकता भासते. त्याचे नियोजन वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलाच्या आतील गाभाऱ्यात करण्यात आले आहे. या भागातील सुमारे १८ ब्रिटिशकालीन तलाव आजही वन्यप्राणी व गावकऱ्यांची तहान भागवित आहे. वन्यप्राणी, पक्षी, वृक्षांच्या पिढ्या या तलावाने आबाद झाल्यात.वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात असलेल्या रत्नापूर तलाव, भिवापूर तलाव, माळेगाव तलाव, पोहरा तलाव, सावंगा तलाव, वासलापूर तलाव, भवानी तलाव, बग्गी तलाव, इंदला तलाव, घातखेडा तलाव, शेवती तलाव, कारला तलाव, मार्डी तलाव, तपोवनेश्वर तलाव, छत्री तलाव, वडाळी तलाव, मालखेड तलाव, कोंडेश्वर तलावापैकी काही नजीकच्या गावांच्या नावाने, तर काही विशिष्ट खुणांमुळे नावारूपास आले. काही नैसर्गिक तलावांचे संवर्धन करताना ब्रिटिशांनी प्राकृतिक रचना कायम ठेवली. या १८ तलावांपैकी छत्री तलाव, वडाळी तलाव, मालखेड तलाव, कोंडेश्वर तलाव हे पिकनिक स्पॉट झाले आहेत. काही तलावांवर मासेमारांची वर्दळ असते. जंगलाच्या मध्यभागाच्या गाभाºयात असलेल्या १४ तलावांवर हजारोंच्या संख्येने वन्यप्राणी तहान भागवितात. यापैकी काही तलावांचा पाणीसाठा २० ते २३ टक्क्यांवर आला आहे.तलावानजीक असलेल्या डेरेदार वृक्षांना जगविण्याचे श्रेयदेखील या तलावांनाच जाते. येथील वृक्षवेलींच्या अनेक प्रजाती आहेत.१८ तलावांपैकी काही तलाव गावाच्या अगदी नजीक असल्याने गावालाही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे त्या तलावाचा गाळ उपसल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल. याचा फायदा तलावाशेजारच्या गावांना होईल. या तलावाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे.

टॅग्स :Waterपाणी