शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

जमिनीत आर्द्रतेचा अभाव; तुरीवर ‘मर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 9:22 PM

चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोºयावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : हलक्या, मध्यम जमिनीतील पिके पिवळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोऱ्यावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.जिल्ह्यात आंतरपीख या अर्थानेच तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात खरिपाचे सहा लाख ८४ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असताना १ लाख १३ हजार हेक्टरमध्ये तुरीचे क्षेत्र आहे. यंदा पेरणीपासून पाऊस कमी असल्याने पिकाच्या वाढीवर याचा मोठा परिणाम झाला. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे. सप्टेंबर व आॅक्टोबर महिण्यातील पावसाचे खंड देखील तुरीला बाधक ठरले आहेत. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्र वगळता अन्य क्षेत्राता तुरीची वाढ फारसी झालेली नाही. आर्द्रता टिकवून ठेवणाऱ्या जमिनी व्यतिरीक्त अन्य जमिनीत तुरीला वातावरणात थंडी व जमिनीत ओलावा आवश्यक आहे. यंदा मात्र, याचा अभाव असल्याने तुरीच्या सरासरी उत्पादनात किमान २५ ते ४० टक्कयांनी कमी येण्याची भिती निर्माण झालेली आहे.तुरीचे तालुकानिहाय पेरणीक्षेत्रजिल्ह्यात तुरीचे १ लाख ९२ हजार ८१२ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ३४१ हेक्टर, चिखलदरा २ हजार ८९५, अमरावती ८ हजार ६४०, भातकुली ९ हजार ७५१, नांदगाव खंडेश्वर ९ हजार २१२, चांदूर रेल्वे ७ हजार ५०, तिवसा ४ हजार ९४६, मोर्शी ९ हजार ९०६, वरूड ७ हजार २९७, दर्यापूर १२ हजार १३२, अंजनगाव सुर्जी ६ हजार ९७३, अचलपूर ८ हजार १६, चांदूर बाजार ५ हजार ९१३ व धामणगाव तालुक्यात ८ हजार २०९ हेक्टर क्षेत्र आहे.उत्पादनात घट होण्याची कारणेसुरुवातीला पाऊस उशिरा; नंतर खंड. यामुळे तूर वाढीला पुरेसा कालावधी मिळाला नाहीफुलोºयावर असताना पाऊस नाही, जमिनीत आर्द्रतेचा अभाव, यामुळे झाडे पिवळी पडून फुलोर गळत आहे.सद्यस्थितीत तुरीला आवश्यक असणारी थंडी नाही. त्यामुळे पिकांवर अळी व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे.या प्रतिकुल परिस्थितीत शेंगा पोचट, दाणा बारीक होणे व किडीमुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे.उपाययोजनातूर फुलोऱ्यांवर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना संरक्षित सिंचन हवे. १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरीयाची फवारणी करताना यामध्ये ग्रेड-२ ही सुक्ष्मअन्नद्रव्ये १० लिटर पाण्यात ७० ग्रॅम टाकावे किंवा पॉनोफिक्स ४ मिलि टाकावे. तुरीवर ‘मर’ आलेली झाडे उपटूून नष्ट करावी तसेच करप्यासाठी २५ ग्रॅमक कॉपर आॅक्सीक्लोराइड १० लिटर पाण्यात मिसळून व स्टिकर मिसळून प्रामुख्याने खोडांवर फवारणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.