रेल्वेने केली विठ्ठल भक्तांची घोर निराशा
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:24+5:302015-07-22T00:34:24+5:30
राज्यातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी मध्यरेल्वे विभागातर्फे सोमवारपासून अकोली ...

रेल्वेने केली विठ्ठल भक्तांची घोर निराशा
संताप : फलाटावर उडाली भाविकांची तारांबळ
बडनेरा : राज्यातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी मध्यरेल्वे विभागातर्फे सोमवारपासून अकोली रोडस्थित नया अमरावती रेल्वेस्टेशन येथून मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता विशेष पंढरपूर रेल्वे रवाना करण्यात आली. ही स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आल्याने भाविकांमध्ये कमालीचा उत्साह होता. परंतु याच वेळी स्टेशनवर भुसावळ-नरखेड पॅसेंजर गाडी पोहोचल्याने प्रवाशांची पंढरपूरसाठी जाणाऱ्या रेल्वे गाडी पकडण्यासाठी तारांबळ उडाली होती.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला अमरावती जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांची गर्दी बघता यंदा राज्य परिवहन महामंडळ व रेल्वेविभागाने पंढरपूरसाठी स्पेशल गाडी सुुरु केली आहे. अमरावती येथील नया अमरावती स्टेशनवर दुपारपासून पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी झाली होती. याचवेळी दुसरी गाडी प्लॅटफार्म क्रमांक तसेच दुसरी गाडीसुध्दा याच गाडीच्या बाजूला येऊन थांबल्याने भाविकांना रेल्वेलाईन ओलांडून पंढरपुरगाडीत बसावे लागले.
यावेळी भाविकांची अचानक गर्दी झाल्याने गाडीत जागा मिळविण्यासाठी तारांबळ उडाली होती. वृध्द नागरिकांना रेल्वेमार्ग ओलांडून ऐनवेळी दुसऱ्या लाईनवर जावे लागले. यामुळे सर्वाधिक त्रास लहान मुले व वृध्द प्रवाशांना झाला. विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या भाविकांनी रेल्वे प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.(शहर प्रतिनिधी)