शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खरपी अचलपूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मध्य प्रदेश सीमारेषा आणि जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरीच्या प्रवेशद्वारावरील खरपी गावाचा समावेश चांदूरबाजार ...

ठळक मुद्देमुक्तागिरीच्या प्रवेशद्वारालगतचे गाव : चांदूर बाजार तालुक्यातून बाद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मध्य प्रदेश सीमारेषा आणि जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरीच्या प्रवेशद्वारावरील खरपी गावाचा समावेश चांदूरबाजार तालुक्यातून अखेर अचलपूर तालुक्यात झाला आहे. येथील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना आपला तालुका कोणता लिहायचा, या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अध्यादेशातून मिळाले आहे.विद्यार्थ्यांना आता शाळेच्या फलकावर सोडलेल्या तालुक्याच्या कोऱ्या जागेवर तालुका अचलपूर, असे लिहिता येणार आहे. दुसरीकडे चांदूरबाजार तालुक्यातील २९०५ नागरिकांचा समावेश आता अचलपूर तालुक्यात झाला आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने ‘सांगा आमचा तालुका कोणता?’, नागरिकांना पडला प्रश्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.शासन राजपत्र अधिसूचनेद्वारे २१ जानेवारी २०१४ पासून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्याच्या चतुर्सिमेत बदल करून खरपी हे गाव चांदूरबाजार तालुक्यातून वगळून अचलपूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३० मे रोजी आदेश धडकले. चांदूर बाजार तालुक्यातील खरपी ग्रामपंचायतीचा समावेश अचलपूर तालुक्यात करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांनी प्रशासनाला आवश्यक सर्व दस्तऐवज, अर्ज आदी शासकीय बाबी केव्हाच पूर्ण केल्या. खरपी येथे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तलाठी दप्तर आदी असून तीन हजार लोकसंख्या, तर मतदारसंख्या दोन हजारांवर आह. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनीही खरपीवासीयांना अचलपूर तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी शासनाला पत्र दिले होते. त्यावर आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तहसील यंत्रणेकडून खरपी गावाच्या सर्व दस्ताऐवजांवर चांदूर बाजारऐवजी अचलपूर तालुक्याचा उल्लेख यापुढे होणार आहे.शाळेच्या फलकावर होणार तालुका बदलखरपी हे गाव ५० वर्षांपूर्वी अचलपूर तालुक्यात होते. त्यानंतर त्याचा समावेश चांदूरबाजार तालुक्यात करण्यात आला. मात्र, हा निर्णय नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास देणारा ठरला. त्यामुळे अचलपूर तालुक्यातच खरपीचा समावेश व्हावा, या मागणीच्या पूर्ततेसाठी चार वर्षांपूर्वी कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या फलकावर तालुक्याचे नाव खोडण्यात आले होते. आता या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.३० किमीचा नाहक त्रासपरतवाडा शहरापासून खरपी सात किलोमीटर अंतरावर आहे. चांदूर बाजारचे अंतर ३० किलोमीटर आहे. नागरिकांना कुठल्याही शासकीय कामासाठी साठ किलोमीटरचा आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत होता. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.खरपी गावाचा सर्व प्रशासकीय व्यवहार अचलपूर तालुक्यातून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार खरपी गावाचा समावेश अचलपूर तालुक्यात करण्यात आला आहे. सर्व शासकीय व्यवहार आता अचलपूर तालुक्यातून सुरू झाले आहे.- निर्भय जैन,तहसीलदार, अचलपूर