शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

खरपी अचलपूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मध्य प्रदेश सीमारेषा आणि जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरीच्या प्रवेशद्वारावरील खरपी गावाचा समावेश चांदूरबाजार ...

ठळक मुद्देमुक्तागिरीच्या प्रवेशद्वारालगतचे गाव : चांदूर बाजार तालुक्यातून बाद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मध्य प्रदेश सीमारेषा आणि जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरीच्या प्रवेशद्वारावरील खरपी गावाचा समावेश चांदूरबाजार तालुक्यातून अखेर अचलपूर तालुक्यात झाला आहे. येथील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना आपला तालुका कोणता लिहायचा, या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अध्यादेशातून मिळाले आहे.विद्यार्थ्यांना आता शाळेच्या फलकावर सोडलेल्या तालुक्याच्या कोऱ्या जागेवर तालुका अचलपूर, असे लिहिता येणार आहे. दुसरीकडे चांदूरबाजार तालुक्यातील २९०५ नागरिकांचा समावेश आता अचलपूर तालुक्यात झाला आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने ‘सांगा आमचा तालुका कोणता?’, नागरिकांना पडला प्रश्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.शासन राजपत्र अधिसूचनेद्वारे २१ जानेवारी २०१४ पासून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्याच्या चतुर्सिमेत बदल करून खरपी हे गाव चांदूरबाजार तालुक्यातून वगळून अचलपूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३० मे रोजी आदेश धडकले. चांदूर बाजार तालुक्यातील खरपी ग्रामपंचायतीचा समावेश अचलपूर तालुक्यात करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांनी प्रशासनाला आवश्यक सर्व दस्तऐवज, अर्ज आदी शासकीय बाबी केव्हाच पूर्ण केल्या. खरपी येथे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तलाठी दप्तर आदी असून तीन हजार लोकसंख्या, तर मतदारसंख्या दोन हजारांवर आह. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनीही खरपीवासीयांना अचलपूर तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी शासनाला पत्र दिले होते. त्यावर आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तहसील यंत्रणेकडून खरपी गावाच्या सर्व दस्ताऐवजांवर चांदूर बाजारऐवजी अचलपूर तालुक्याचा उल्लेख यापुढे होणार आहे.शाळेच्या फलकावर होणार तालुका बदलखरपी हे गाव ५० वर्षांपूर्वी अचलपूर तालुक्यात होते. त्यानंतर त्याचा समावेश चांदूरबाजार तालुक्यात करण्यात आला. मात्र, हा निर्णय नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास देणारा ठरला. त्यामुळे अचलपूर तालुक्यातच खरपीचा समावेश व्हावा, या मागणीच्या पूर्ततेसाठी चार वर्षांपूर्वी कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या फलकावर तालुक्याचे नाव खोडण्यात आले होते. आता या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.३० किमीचा नाहक त्रासपरतवाडा शहरापासून खरपी सात किलोमीटर अंतरावर आहे. चांदूर बाजारचे अंतर ३० किलोमीटर आहे. नागरिकांना कुठल्याही शासकीय कामासाठी साठ किलोमीटरचा आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत होता. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.खरपी गावाचा सर्व प्रशासकीय व्यवहार अचलपूर तालुक्यातून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार खरपी गावाचा समावेश अचलपूर तालुक्यात करण्यात आला आहे. सर्व शासकीय व्यवहार आता अचलपूर तालुक्यातून सुरू झाले आहे.- निर्भय जैन,तहसीलदार, अचलपूर