खरिपाचे ३७ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर; रबीची होणार क्षेत्रवाढ

By Admin | Updated: August 25, 2015 00:22 IST2015-08-25T00:22:31+5:302015-08-25T00:22:31+5:30

खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो.

Kharif's 37,000 hectare area is still not available; Rabi rabi hike | खरिपाचे ३७ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर; रबीची होणार क्षेत्रवाढ

खरिपाचे ३७ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर; रबीची होणार क्षेत्रवाढ

अमरावती : खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो. यंदा मात्र कृषी विभागाने नियोजन केलेल्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. हे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राची सुरुवात होते. ही जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात असते. मान्सून सक्रिय असल्यास जून अखेरीस फार तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाचा हंगाम संपतो. खरीप हंगामासाठी सर्वसाधारण अशी स्थिती असते. मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरिपाच्या हंगामावर परिणाम होत आहे.
दरवर्षीच्या खरीप पेरणीला जुलैअखेर ते आॅगस्ट महिना उजाडत आहे. यंदा २० आॅगस्टपर्यंत ९५ टक्केच क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७२ टक्केच पेरणी झालेली आहे. या तालुक्यात ५७ हजार ९७० सरासरी खरिपाचे क्षेत्र असताना ४१ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. अद्यापही १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर आहे.
चिखलदरा तालुक्यात ३० हजार ५२० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत २३ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ७ हजार ९० हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. त्यामुळे हे क्षेत्र नापेर राहणार आहे व हे नापेर क्षेत्र रबीमध्ये रुपांतरित होणार आहे. (प्रतिनिधी)

यंदा अचलपूर, चिखलदरा तालुका माघारला

नांदगावने केली खरिपाची सरासरी पार
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कृषी विभागाने ५८ हजार ४५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले होते. मात्र सद्यस्थितीत ६४ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, याची टक्केवारी ११० एवढी आहे. दर्यापूर तालुक्यात १०८ टक्के पेरणी झालेली आहे. अन्य १२ तालुक्यांची पेरणी सरासरीच्या आत आहेत.
अपेक्षित सरासरी इतका पाऊ स
जिल्ह्यात १ जून ते २३ आॅगस्टदरम्यान पावसाची ५८५.५ मि.मी. टक्केवारी अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ५९०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात पाऊस निरंक आहे. अजून ४ ते ५ दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. २७ आॅगस्टनंतर पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

Web Title: Kharif's 37,000 hectare area is still not available; Rabi rabi hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.