शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

7.28 लाख हेक्टरमध्ये खरीप हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय २.५२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमृग उद्यापासून, १५ जूनपर्यंत पेरणी नकोच, सर्वाधिक २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र २४ तासांवर आले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता १५ जूनपर्यत पेरणी नकोच, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, ७.२८ लाख हेक्टरवरील खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे बाजारात सध्या धूमशान सुरू आहे.यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय २.५२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.तुरीचे पीक जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने आंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा १.३० लाख हेक्टर प्रस्तावित असले तरी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय २० हजार हेक्टरमध्ये मूग व १० हजार हेक्टरमध्ये उडीद प्रस्तावित आहे. तसे पाहता, ६० दिवसांचे हे पीक मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असल्याने शेतकरी आश्वस्त आहेत. याशिवाय २२ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, चार हजार हेक्टरमध्ये धान, १५ हजार हेक्टरमध्ये मका व सहा हजार हेक्टरमध्ये इतर पिके राहतील. सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये बऱ्याचअंशी शिथिलता दिल्याने बियाणे बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ वाढणार आहे. शेतमजुरांच्याही हाताला काम मिळाल्याने सर्वत्र उत्साही वातावरण आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासणी व बीजप्रक्रिया महत्त्वाची असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. 

महाबीज बियाण्यांचा तुटवडायंदा महाबीजद्वारे सोयाबीनचे १५,३८० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बियाण्यांची मागणी १.३० लाख क्विंटल आहे. महाबीजचे बियाणे ७५ रुपये किलो, तर खासगी कंपन्यांचा १०० ते १२० रुपये किलो असा दर आहे. त्यामुळे कृषिसेवा केंद्रांमध्ये सध्या रांगा आहेत. मात्र, महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.

बीटीच्या १२.५७ लाख पाकिटांची आवश्यकतायंदाच्या हंगामात बीटी बियाण्यांच्या १२,५७,७१० पाकिटांची आवश्यकता आहे. याशिवाय सोयाबीन १५,३८० क्विंटल, संकरित ज्वारी २,२०० क्विंटल, बाजरी ०.४० क्विंटल, मका २,४०० क्विंटल, तूर ५,४६० क्विंटल, मूग ९६० क्विंटल, उडीद ८४० क्विंटल, भुईमूग ४५० क्विंटल, सूर्यफूल ५ क्विंटल असे बियाणे लागणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

कृषी विभागाचा सल्ला मोलाचाजमिनीत किमान सात इंच ओल किंवा १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. बियाणे महाग आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी १५ ते १७ जूननंतरच पाऊस पाहून पेरणी करावी व बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी, बीजप्रक्रिया करावी.  याशिवाय तीळ, तूर किंवा ज्वारी, तूर यांसारखे पीकदेखील फायदेशीर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती