शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

7.28 लाख हेक्टरमध्ये खरीप हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय २.५२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमृग उद्यापासून, १५ जूनपर्यंत पेरणी नकोच, सर्वाधिक २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र २४ तासांवर आले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता १५ जूनपर्यत पेरणी नकोच, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, ७.२८ लाख हेक्टरवरील खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे बाजारात सध्या धूमशान सुरू आहे.यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय २.५२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.तुरीचे पीक जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने आंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा १.३० लाख हेक्टर प्रस्तावित असले तरी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय २० हजार हेक्टरमध्ये मूग व १० हजार हेक्टरमध्ये उडीद प्रस्तावित आहे. तसे पाहता, ६० दिवसांचे हे पीक मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असल्याने शेतकरी आश्वस्त आहेत. याशिवाय २२ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, चार हजार हेक्टरमध्ये धान, १५ हजार हेक्टरमध्ये मका व सहा हजार हेक्टरमध्ये इतर पिके राहतील. सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये बऱ्याचअंशी शिथिलता दिल्याने बियाणे बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ वाढणार आहे. शेतमजुरांच्याही हाताला काम मिळाल्याने सर्वत्र उत्साही वातावरण आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासणी व बीजप्रक्रिया महत्त्वाची असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. 

महाबीज बियाण्यांचा तुटवडायंदा महाबीजद्वारे सोयाबीनचे १५,३८० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बियाण्यांची मागणी १.३० लाख क्विंटल आहे. महाबीजचे बियाणे ७५ रुपये किलो, तर खासगी कंपन्यांचा १०० ते १२० रुपये किलो असा दर आहे. त्यामुळे कृषिसेवा केंद्रांमध्ये सध्या रांगा आहेत. मात्र, महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.

बीटीच्या १२.५७ लाख पाकिटांची आवश्यकतायंदाच्या हंगामात बीटी बियाण्यांच्या १२,५७,७१० पाकिटांची आवश्यकता आहे. याशिवाय सोयाबीन १५,३८० क्विंटल, संकरित ज्वारी २,२०० क्विंटल, बाजरी ०.४० क्विंटल, मका २,४०० क्विंटल, तूर ५,४६० क्विंटल, मूग ९६० क्विंटल, उडीद ८४० क्विंटल, भुईमूग ४५० क्विंटल, सूर्यफूल ५ क्विंटल असे बियाणे लागणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

कृषी विभागाचा सल्ला मोलाचाजमिनीत किमान सात इंच ओल किंवा १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. बियाणे महाग आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी १५ ते १७ जूननंतरच पाऊस पाहून पेरणी करावी व बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी, बीजप्रक्रिया करावी.  याशिवाय तीळ, तूर किंवा ज्वारी, तूर यांसारखे पीकदेखील फायदेशीर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती