शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

खरीप उद्ध्वस्त; सुधारित पैसेवारी ६२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 6:00 AM

अवकाळी पावसामुळे सोयाबीन जाग्यावर सडले. गंजी ओल्या झाल्याने सोयाबीनला बिजांकूर फुटले. कापूस झाडावरच ओला झाला. आता सरकीतून कोंब यायला लागले आहे. हंगामाच्या सुरुवातील कमी पावसामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके केव्हाच बाद झाली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरला नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : जिल्ह्यात बाधित दीड लाख हेक्टरचे पंचनामे सुरु असताना महसूलचा कुटाराघात

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबरचे दरम्यान अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या दीड लाख हेक्टरमधील पिकांचे सर्वेक्षण अन् पंचनामे सुरू असतानाच खरिपाची सुधारित ६२ पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा ठरला आहे. महसूल यंत्रणेला वास्तवाचे भान नाही काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.अवकाळी पावसामुळे सोयाबीन जाग्यावर सडले. गंजी ओल्या झाल्याने सोयाबीनला बिजांकूर फुटले. कापूस झाडावरच ओला झाला. आता सरकीतून कोंब यायला लागले आहे. हंगामाच्या सुरुवातील कमी पावसामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके केव्हाच बाद झाली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरला नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर केली. यामध्ये सुधारणेला वाव आहे, असे सांगत ३१ ऑक्टोबरला १९६१ गावांतील सुधारित ६२ पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसाने व अवकाळी पावसाने उद्वस्त होऊनही महसूल यंत्रणेद्वारा, पैसेवारीत शेतकºयांची थट्टा आरंभली आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवाती पावसात खंड राहिला. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाधित झाली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनदेखील बाधित झाले. हजारो हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट आले. हजारो हेक्टर शेती अजूनही नापेर आहे. मागील महिन्यांपासून आलेल्या पावसाने जिल्ह्याची सरासरी पार केली असली तरी या पावसाचा उपयोग रबीसाठी होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांच्या सरासरीत उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आली आहे. मात्र, महसूल विभागाच्या नजरेत सर्व काही आॅलवेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस भातकुली तालुक्यात असताना ५७ पैसेवारी जाहीर केली आहे. अमरावती तालुक्यात ६२, तिवसा ६३, चांदूर रेल्वे ५८, धामणगाव रेल्वे ६३, नांदगाव खंडेश्वर ५९, मोर्शी ६८, वरूड ७१, अचलपूर ६२, चांदूरबाजार ५९, दर्यापूर ६०, अंजनगाव सुर्जी ६९, धारणी ६० व चिखलदरा तालुक्यात ५४ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्चदेखील निघणे मुस्किल असताना अंतिम पैसेवारीत तरी जिल्ह्याचे वास्तववादी चित्रण होणार काय, असा सवाल बळीराजाचा आहे.महसूल यंत्रणेद्वारा शेतकऱ्यांचा विश्वासघातजिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यानच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील खरिपाची पिके ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. ५ नोव्हेंबरच्या आत संयुक्त पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी व महसूल यंत्रणा ३० ऑक्टोबरपासून शिवारात डेरेदाखल झाली. युद्धस्तरावर प्रक्रिया होत असताना हीच महसूल यंत्रणा ३१ ऑक्टोबरला ६२ पैसेवारी दाखवितेच कशी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यामध्ये शेतकºयांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :agricultureशेती