शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

खरीपाची आपदास्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:24 IST

सुरूवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस. त्यातही २ जुलैपासून पावसाची दडी यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तीन लाख हेक्टरवरील पिकांना मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी आपदास्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून पावसाची दडी : आपत्कालीन पीक नियोजनासाठी कृषी विद्यापीठाचा आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरूवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस. त्यातही २ जुलैपासून पावसाची दडी यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तीन लाख हेक्टरवरील पिकांना मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी आपदास्थिती निर्माण झाली आहे. यासाठी केंद्र शासनाचे ‘आयसीएआर’द्वारा जिल्हानिहाय पीक आराखडा तयार केला व कृषी विद्यापीठानेही आपत्कालीन पीक नियोजन आरखडा तयार केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने मृदसंधारण व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी बांधबंदिस्ती, सरी व वरंबा पद्धत, संद वरंबा पद्धत, ओलावा टिकविण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यामुळे पिकांचे अवशेष व शेणखत्याच्या सततच्या वापरामुळे शेतजमिनीतील कर्ब वाढून मातीचा कस, जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता व जलधारणक्षमता सुधारण्यास मदत होते. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी पिकामध्ये २१ दिवसांनी कोळपणी करून पिकास मातीची भर द्यावी. पावसाचे ताण असलेल्या पिकावर दोन टक्के युरिया/डीएपीची फवारणी करावी. फळबागांमध्ये आच्छादनासाठी झाडाच्या बुध्यांशी वाळलेले गवत धसकटे किंवा पालापाचोळा आदींचे आच्छादन करावे. फळबागांमध्ये पाण्याचा ताण पडू नये म्हणून केवोलीन ८ टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के या प्रमाणात फवारणी करावी. फळबागांमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी तसेच खोडांना १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या शिफारसीनुसार नियमित मोसमी पाऊस जर दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास त्याला आपत्कालीन परिस्थिती संबोधली जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनात तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्यत बदल करावा लागतो, अन्यथा उत्पादनात कमी येते. पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्यास अशावेळी संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर वाºयाचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी तुषार सिंचन करावे, कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.पावसाळा चार आठवड्यांपेक्षा अधिक उशिरा सुरू झाल्यास (१६ ते २२ जुलै)पहिल्याप्रमाणेच पिकांचे नियोजन करावे, साधारणपणे १० ते २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा. कपाशीच्या ओळींची संख्या कमी करून एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. ज्वारीची पेरणी करू नये. पेरल्यास खोडमाशीच्या प्रतिबंधासाठी तयारी ठेवावी. मूग व उडदाची पेरणी शक्यतोवर करू नये. केवळ नापेर क्षेत्रावरच करावी व क्षेत्र कमी करावे.पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा अधिक उशिरा सुरू झाल्यास (२३ ते २९ जुलै)कपाशीची पेरणी शक्यतोवर करू नये, परंतु काही क्षेत्रावर करावयाची झाल्यास देशी कपाशीचे सरळ, सुधारित वाण वापरावे. बियाण्यांचा २५ ते ३० टक्के अधिक वापर करावा. कपाशीच्या ओळींची संख्या करून एक ते दोन ओळी तुरीच्या पेराव्यात. ज्वारीची पेरणी करू नये. पेरल्यास खोडमाशीच्या प्रतिबंधासाठी तयारी ठेवावी. ज्वारीमध्ये ३ ते सहा ओळीनंतर तुरीचे आंतरपीक घेतल्यास जोखिम कमी होते. सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. मूग व उडदाची पेरणी अजिबात करू नये.पावसाळा २ ते ३ आठवडे उशिरा सुरू झाल्यास (२ ते १५ जुलै)अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत. साधारणपणे २० टक्के अधिक बियाणे वापरावे, दोन झाडांमधील अंंतर कमी करावे, संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रात आंतरपीक घ्यावे. कापूस : ज्वारी: तूर : ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपिकांचे बियाणे थोडे अधिक प्रमाणात वापरावे. संकरित ज्वारी सीएसएच ९ किंवा सीएसएच १४ वाण वापरावे. सोयाबीनचे टीएएमएस-३८, टीएएमएस ९८-२१ किंवा जेएस ३३५ यापैकी उपलब्ध वाण प्रतिहेक्टरी ७५ ते ८० किलो वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा, किंवा नऊ ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरावी.