शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा; घरांचेही नुकसान, शाळाचे छप्पर उडाल्याने सात विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 20:24 IST

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० ...

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० वाजेपर्यंत तब्बल दोन तास वादळासह विजेच्या कडकडाटात अवकाळीचा जोरदार पाऊस झाला. काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाल्याने अतुल सोमा चतुरकर (१६), रा. काटकुंभ तर बामादेही येथील फत्तुजी झारखंडे विद्यालयाचे जय मिश्रीलाल झाडखंडे (१२), उर्मीला हिरालाल भुसूम (१४), भवनेश्वरी जगदीश नागले (११),  मिनाक्षी शंकर  कास्देकर (१२), सुनीता केंडे बेठेकर (१२), रेशमा रमेश नागले (१३) सर्व रा.बामादेही हे विद्यार्थी जखमी झालेत. त्यांच्यावर काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वीज कोसळून शालीकराव काळमा बेठेकर यांची एक गाय ठार झाली तर बैल भाजल्याने गंभीर जख्मी झाला. कोयलारी येथील रामचरण सलामे यांचा बकरा ठार झाला. तर डोमा येथील कालू बेठे यांचा बैल ठार झाला. चुरणी  येथील मंगल मुंगा सावलकर यांचा बैल ठार झाला. या वादळाने परिसरातील शंभर वर्षे जुनी झाडे उन्मळून पडली. ११ के.व्ही. विद्युत खांब वाकून जमिनीवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.  घरांसह गोठ्यांचे छप्पर उडालेअवकाळी पावसासह वादळ वा-याच्या तडाख्याने बामादेही येथील अरुण    सुरजे, साहेबलाल बेठेकर, सुखदेव नागले, खांजी धिकार, अंतु सुरजे, जीवन झाडखंडे, नितीन झाडखंडे, किसन सेकुकर, राजेश झाडखंडे, सुनील बेठेकर, अतुल झारखंडे, मंगल धुर्वे, सावºया झाडखंडे, गुलाब हरसुलेसह आदींच्या घरांची पडझड होऊन गोठ्यांचे छप्पर उडाले. 

२० गावांचा विद्युत पुरवठा खंडीत गुरुवारच्या वादळाच्या तडाख्यात परिसरातील ११ के.व्ही. विद्युत खांब वाकल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असून पाणी पुरवठा योजना, दळण यंत्र आदी बंद पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 

काटकुंभ व बामादेही गावाला वादळामुळे सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, तर शाळांचे छप्पर उडाले. नुकसानीची माहिती घेण्यासाठी तलाठी व संबंधितांना निर्देश दिले आहे. वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू झाला. - प्रदीप पवार, तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :Rainपाऊस