शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा; घरांचेही नुकसान, शाळाचे छप्पर उडाल्याने सात विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 20:24 IST

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० ...

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० वाजेपर्यंत तब्बल दोन तास वादळासह विजेच्या कडकडाटात अवकाळीचा जोरदार पाऊस झाला. काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाल्याने अतुल सोमा चतुरकर (१६), रा. काटकुंभ तर बामादेही येथील फत्तुजी झारखंडे विद्यालयाचे जय मिश्रीलाल झाडखंडे (१२), उर्मीला हिरालाल भुसूम (१४), भवनेश्वरी जगदीश नागले (११),  मिनाक्षी शंकर  कास्देकर (१२), सुनीता केंडे बेठेकर (१२), रेशमा रमेश नागले (१३) सर्व रा.बामादेही हे विद्यार्थी जखमी झालेत. त्यांच्यावर काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वीज कोसळून शालीकराव काळमा बेठेकर यांची एक गाय ठार झाली तर बैल भाजल्याने गंभीर जख्मी झाला. कोयलारी येथील रामचरण सलामे यांचा बकरा ठार झाला. तर डोमा येथील कालू बेठे यांचा बैल ठार झाला. चुरणी  येथील मंगल मुंगा सावलकर यांचा बैल ठार झाला. या वादळाने परिसरातील शंभर वर्षे जुनी झाडे उन्मळून पडली. ११ के.व्ही. विद्युत खांब वाकून जमिनीवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.  घरांसह गोठ्यांचे छप्पर उडालेअवकाळी पावसासह वादळ वा-याच्या तडाख्याने बामादेही येथील अरुण    सुरजे, साहेबलाल बेठेकर, सुखदेव नागले, खांजी धिकार, अंतु सुरजे, जीवन झाडखंडे, नितीन झाडखंडे, किसन सेकुकर, राजेश झाडखंडे, सुनील बेठेकर, अतुल झारखंडे, मंगल धुर्वे, सावºया झाडखंडे, गुलाब हरसुलेसह आदींच्या घरांची पडझड होऊन गोठ्यांचे छप्पर उडाले. 

२० गावांचा विद्युत पुरवठा खंडीत गुरुवारच्या वादळाच्या तडाख्यात परिसरातील ११ के.व्ही. विद्युत खांब वाकल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असून पाणी पुरवठा योजना, दळण यंत्र आदी बंद पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 

काटकुंभ व बामादेही गावाला वादळामुळे सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, तर शाळांचे छप्पर उडाले. नुकसानीची माहिती घेण्यासाठी तलाठी व संबंधितांना निर्देश दिले आहे. वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू झाला. - प्रदीप पवार, तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :Rainपाऊस