शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

कर्जापायी मुलगा गेला.. तरीही कर्ज कायमच!

By admin | Updated: December 21, 2014 22:52 IST

गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस

मोर्शी : गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस नोकरी करुन कर्ज फेडले. मात्र, अतिश्रमामुळे त्याला रक्तदाबासह कंबरेच्या हाडाचा आजार बळावला आणि त्याला नोकरी सोडावी लागली. ही परिस्थिती आहे नजीकच्या पार्डी या गावातील रुपेश विकासराव मोंढे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची. विकास मोंढे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव आहे. त्यांचेकडे साडेतीन एकर शेत आहे. विकासराव यांच्यावर आता पावेतो दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे त्यांचेकडून शेतीचे काम होत नाही. विकासरावांना दोन मुले आहेत. लहान रुपेश हा शेती पाहत होता. शेती लहान्याने सांभाळली. शिवाय अवघ्या साडेतीन एकरावर कुटूंबाचा उदरनिर्वाह होवू शकत नाही, या भावनेने मोठा मुलगा पंकज याने पुण्यातील एका कारखान्यात नोकरी स्वीकारली होती. पार्डी शिवारात असलेल्या शेती पिकावर जंगली जनावरांचा होणारा प्रादूर्भाव रोखण्याकरिता या कुटुंबाने शेतीला तारेचे कंपाऊंड भरले. त्यासाठी त्यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून कर्ज घेतले होते. शिवाय पीक कर्जही होते. सातत्याने नापिकीमुळे ते कर्ज परतावा करु शकले नाही. त्यांचेकडे १ लक्ष ८८ हजार रुपये व्याजासह थकीत होते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले. त्यातच बँकेच्या कर्जाचे ओझे असल्यामुळे त्रस्त होऊन त्याने २५ आॅगस्ट २०१३ ला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची नोंद महसूल विभागात झाली. तपासणीअंती ही आत्महत्या पात्र समजण्यात आली. ३० हजार रूपये रोख आणि ७० हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र रूपेशच्या वडिलांच्या नावाने काढण्यात आले. रुपेशचा जीव गेला असला तरी कर्ज मात्र फिटले नव्हते. आत्महत्येची धग काही अंशी कमी होताच कर्ज परताव्याकरिता बँकेचे अधिकारी या कुटूंबाकडे जावू लागले. वडीलोपार्जीत शेत जमीन वाचविण्याकरीता पुण्यातील कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत रुपेशचा मोठा भाऊ पंकजने कंबर कसली. दोन पाळयात काम करुन त्याने बँकेचे कर्ज तडजोड करुन फेडले. मात्र, तब्येतीमुळे त्याची नोकरी गेली. यावर्षी विकासरावांनी शेत नातेवाईकाला पेरण्याकरिता दिले. सर्व खर्च या नातेवाईकांनी केला. साडेतीन एकरात कपाशी पेरली. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे आतापर्यंत ४ क्विंटल कापूस हाती आला आहे. त्यातही नातेवाईकांचा हिस्सा पडणार आहे.