आगारात अस्वच्छतेचा कहर !

By Admin | Updated: September 5, 2016 00:26 IST2016-09-05T00:26:47+5:302016-09-05T00:26:47+5:30

येथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Junk at the wreckage of filth! | आगारात अस्वच्छतेचा कहर !

आगारात अस्वच्छतेचा कहर !

आगरप्रमुखांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी खेळ 
संदीप मानकर अमरावती
येथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे नेहमीत स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे व्हॉयरल आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती आगारात एकूण ७० च्यावर बसेस धावतात. त्यांच्या दिवसभर अंदाजे येथून ४०० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. तसेच इतर आगाराच्याही हजारो बसफेऱ्या येथून होतात. त्यामुळे नागरिक खाद्यपदार्थ खाल्यानंतर यथेच्छ घाण करतात. अनेक नागरिक आपल्याजवळील प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा येथेच टाकून देतात. त्यामुळे आगारात सर्वत्र घाण साचते. लहान मुले फळे खातात. केळीची सालसुध्दा येथेच टाकून देतात. गुटखा बहादूरही येथेच खर्रा, पानाच्या पिचकाऱ्या भिंतीवर व परिसरात मारतात. त्यामुळे सर्वत्र घाण होते. येथे कंत्राटी सफाई कामगार नेमण्यात आले आहे. पण ते नियमित स्वच्छता राहत नसल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे.
अधिकारी झोपेत ?
येथील मध्यवर्ती आगार परिसरात अस्वच्छतेचा कहर असतानाही कुणालाही घेणेदेणे नाही. येथे कचरा कचरा पेटीसुध्दा नाही. नागरिकांनाही स्वच्छेतेचे भान नसते. वाटेल तसे ते वागतात. परिणामी त्यांच्याही जीविताला धोका निर्माण होतो. लहान मुलेही प्रवास करतात. त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना लवकरच आजार जडण्याची शक्यता असते. मात्र एकीकडे देशात भारत स्वच्छता अभियान राबविले जात असताना अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे येथे अस्वच्छेतेचे साम्राज्य वाढत आहे. अधिकारी झोपेत तर नाही ना, असा प्रश्नही नागरिकांच्यावतीने विचारला जात आहे.

आडोशाला
जाऊन लघुशंका
येथे अधिकृत प्रसाधनगृह आहे. पण या प्रसाधनगृहातही प्रचंड घाण असते. त्यामुळे अनेक नागरिका येथे न जाता. ज्या ठिकाणी आगाराच्या भिंतीजवळ बसेस उभ्या राहतात. य ाठिकाणी अळोशाला जाऊन राजोरोसपणे लघुशंका करतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरते. यातूनच अनेक आजाराला आमंत्रण मिळते. या प्रकाराला आगार व्यवस्थापकाने आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

आगारात शिरतात दुचाकी
आधी सुरक्षितेच्या दुष्टीकोणातून आगार परिसरात खासगी नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही लावण्यात आले होते. परंतू काही दिवसातच हा नियम स्थिील करण्यात आला आहे. य ा ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या डोळयादेखत नागरिक राजोरसपणे आपली वाहने या ठिकाणी परिसरात फिरवितात. येथे पोलिस चौक ी असतानाही कुठल्याच वाहन चालकांविरुध्द कारवाई होताना दिसत नाही.

Web Title: Junk at the wreckage of filth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.