३० जूनपासून राज्यातील ग्रामसेवकांचे पुन्हा आंदोलन
By Admin | Updated: June 21, 2014 23:47 IST2014-06-21T23:47:51+5:302014-06-21T23:47:51+5:30
शासन आणि प्रशासन स्तरावर मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. येत्या ३० जूनपासून अमरावतीसह

३० जूनपासून राज्यातील ग्रामसेवकांचे पुन्हा आंदोलन
अमरावती : शासन आणि प्रशासन स्तरावर मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. येत्या ३० जूनपासून अमरावतीसह राज्यातील ग्रामसेवकांनी बेमुदत काम बंद अांदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ग्रामसेकांनी आंदोलन स्थगित केले होते. या आंदोलनाची शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. परिणामी शासनाने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार (नरेगा) साठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ रुजू झाल्यापासून गृहित धरावा, २० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, अशा विविध मागण्यांसाठी पुन्हा ग्रामसेवकांनी रस्त्यावर
उतरण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयांतर्गत करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून रोजी जिल्ह्यातील ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायतींच्या चाव्या, शिक्के, संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात येईल. २ जुलैपासून बेमुदत काम बंद अांदोलन सुरू करून २ ते १५ जुलै पर्यंत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाईल. या आंदोलनात जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे यांनी केले आहे.