शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

जानेवारीत महापालिकेची ‘स्वच्छ’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:53 IST

देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : पूर्वतयारीला वेग; स्वच्छतागृह उभारणीवर भर

आॅनलाईन लोकमतअमरावती : देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे. शहरात स्वच्छतेच्या मुद्द्यावर अहमहमिका लागली आहे. अमरावती महापालिकेने त्यासाठी मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांना ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर नेमून लोकसहभागाला साद घातली आहे.सन २०१७ च्या जानेवारीत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात अमरावती तब्बल २३१ व्या क्रमांकावर पिछाडल्याने यंदा ती नामुष्की टाळण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी हातात हात घालून कामाला लागले आहेत.४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत देशभरातील ४,०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील काऊंन्सिल आॅफ इंडियाचे पथक शहरा-शहरांत स्वच्छतेचे सर्वेक्षण करणार आहे. स्वच्छताविषयक ७१ बाबींवर हे स्वच्छ सर्वेक्षण होणार असून, राज्य आणि विभागीय स्तरावर शहरांचे गुणाांकन केले जाईल. २०१८ मध्ये होणारे हे तिसरे स्वच्छ सर्वेक्षण आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरांनी सहभाग घेतला. ही परीक्षा दोन हजार गुणांची होती. स्वच्छतेच्या माध्यमातून गरिबी व आरोग्याच्या प्रश्न समस्येवर मात करण्यासाठी केंद्राने हा महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला आहे.देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतागृह पुरविण्यासह घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, प्रक्रिया आणि कचरा संकलन हे घटक स्वच्छ सर्वेक्षणात अंतर्भूत आहेत. संपूर्ण शहर हगणदरीमुक्त करून घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविणाºया शहरांना पुरस्कारार्थ प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात येईल. त्यादृष्टीने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन कामाला लागले आहेत. वैयक्तिक शौचालयांसह सार्वजनिक, सामुदायिक स्वच्छतागृहांची उभारणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा विलगीकरण आणि स्वच्छतेसाठी अ‍ॅप कार्यान्वित करण्यासोबतच स्वच्छतेविषयक मोहीम, अभियान व जनजागृती हाती घेण्यात आली आहे.नागरिकांच्या प्रतिक्रिया १४०० गुणांच्याजानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये होऊ घातलेल्या चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी स्वच्छतेविषयक कसे कामकाज केले, त्याबाबतच्या प्रतिक्रियांवर १४०० गुण अवलंबून आहेत. याशिवाय प्रत्यक्ष निरीक्षणाला १२०० गुण, तर स्वच्छतेविषयक सेवास्तरावरील प्रगतीसाठी १४०० गुण आहेत.जानेवारी २०१८ मध्ये तिसरे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. या चार हजार गुणांच्या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला वेग दिला आहे.- हेमंतकुमार पवार,आयुक्त, महापालिका