शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत

By जितेंद्र दखने | Updated: July 28, 2023 16:45 IST

२०२४ पर्यत कसे पोहोचणार हर घर नळ से जल योजनेचे पाणी

अमरावती : जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनेच्या कामासाठी पहिल्या टप्यात पाणी पुरवठा विभागाला २७ कोटी ४० लाखाचा निधी गत मार्च एप्रिलमध्ये मिळाला.सदर निधी खर्च झाल्यानंतर मात्र दुसऱ्या टप्यात ४० कोटीच्या निधी पैकी आजघडीला छदामही मिळालेला नाही. दरम्यान जलजीवनची कामे करणाऱ्या ठेकेदारांना महिनाभरा पासून देयके मिळाली नसल्याने कामे ठप्प आहेत. 

जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित केले आहे. जिल्हयातील ६६१ गावांसाठी ६६१जलजीवन योजना मंजूर आहेत. या योजनांपैकी २२९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४३२ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा दिला जातो. त्यानुसार आतापर्यत जलजीवन मिशनला शासनाकडून पहिल्या टप्यात २७ कोटी ४० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीमधून २२९ कामे पूर्ण झालेली आहे. २७ कोटी ४२ लाख रूपयाचा खर्च झालेला आहे.

प्रत्येकी तीन महिन्या टप्यात जलजीवन मिशनसाठी शासनाकडून निधी दिला जातो. परंतु एप्रिल महित्यात दिलेल्या २७ कोटी ४० लाखाच्या निधीचा अपवाद सोडला तर आता उर्वरित डिसेंबर अखेरपर्यतच्या कामासाठी सुमारे ४० कोटी रूपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केला आहे. मात्र यापैकी एक रूपयाचाही निधी अद्यापपर्यत मिळालेला नाही. त्यामुळे जलजीवन मिशनची जिल्हाभराती कामे विस्कळीत झालेली आहे.

११ कोटीचे देयके पडून

जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात कंत्राटदरांनी पाणी पुरवठयाची विविध कामे केलेली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर देयकांचे प्रस्तावही सादर केलेले आहेत. मात्र जलजीवन मिशन योजनेसाठी सध्या निधी उलब्ध झाला नसल्याने ११ कोटीची देयके पडून आहेत. त्यामुळे कंत्राटदारही त्रस्त झाले आहेत. कामे केल्यानंतरही देयके वेळेवर मिळालेले नाही. त्यामुळे पुढचे काम करण्यासाठी ठेकेदारांकडे निधी नाही, यामुळे कामे मुदतीत पूर्ण होणे शक्य नसल्याचे कंत्राटदरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद