शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत

By जितेंद्र दखने | Updated: July 28, 2023 16:45 IST

२०२४ पर्यत कसे पोहोचणार हर घर नळ से जल योजनेचे पाणी

अमरावती : जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनेच्या कामासाठी पहिल्या टप्यात पाणी पुरवठा विभागाला २७ कोटी ४० लाखाचा निधी गत मार्च एप्रिलमध्ये मिळाला.सदर निधी खर्च झाल्यानंतर मात्र दुसऱ्या टप्यात ४० कोटीच्या निधी पैकी आजघडीला छदामही मिळालेला नाही. दरम्यान जलजीवनची कामे करणाऱ्या ठेकेदारांना महिनाभरा पासून देयके मिळाली नसल्याने कामे ठप्प आहेत. 

जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित केले आहे. जिल्हयातील ६६१ गावांसाठी ६६१जलजीवन योजना मंजूर आहेत. या योजनांपैकी २२९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४३२ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा दिला जातो. त्यानुसार आतापर्यत जलजीवन मिशनला शासनाकडून पहिल्या टप्यात २७ कोटी ४० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीमधून २२९ कामे पूर्ण झालेली आहे. २७ कोटी ४२ लाख रूपयाचा खर्च झालेला आहे.

प्रत्येकी तीन महिन्या टप्यात जलजीवन मिशनसाठी शासनाकडून निधी दिला जातो. परंतु एप्रिल महित्यात दिलेल्या २७ कोटी ४० लाखाच्या निधीचा अपवाद सोडला तर आता उर्वरित डिसेंबर अखेरपर्यतच्या कामासाठी सुमारे ४० कोटी रूपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केला आहे. मात्र यापैकी एक रूपयाचाही निधी अद्यापपर्यत मिळालेला नाही. त्यामुळे जलजीवन मिशनची जिल्हाभराती कामे विस्कळीत झालेली आहे.

११ कोटीचे देयके पडून

जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात कंत्राटदरांनी पाणी पुरवठयाची विविध कामे केलेली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर देयकांचे प्रस्तावही सादर केलेले आहेत. मात्र जलजीवन मिशन योजनेसाठी सध्या निधी उलब्ध झाला नसल्याने ११ कोटीची देयके पडून आहेत. त्यामुळे कंत्राटदारही त्रस्त झाले आहेत. कामे केल्यानंतरही देयके वेळेवर मिळालेले नाही. त्यामुळे पुढचे काम करण्यासाठी ठेकेदारांकडे निधी नाही, यामुळे कामे मुदतीत पूर्ण होणे शक्य नसल्याचे कंत्राटदरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद