शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत

By जितेंद्र दखने | Updated: July 28, 2023 16:45 IST

२०२४ पर्यत कसे पोहोचणार हर घर नळ से जल योजनेचे पाणी

अमरावती : जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनेच्या कामासाठी पहिल्या टप्यात पाणी पुरवठा विभागाला २७ कोटी ४० लाखाचा निधी गत मार्च एप्रिलमध्ये मिळाला.सदर निधी खर्च झाल्यानंतर मात्र दुसऱ्या टप्यात ४० कोटीच्या निधी पैकी आजघडीला छदामही मिळालेला नाही. दरम्यान जलजीवनची कामे करणाऱ्या ठेकेदारांना महिनाभरा पासून देयके मिळाली नसल्याने कामे ठप्प आहेत. 

जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित केले आहे. जिल्हयातील ६६१ गावांसाठी ६६१जलजीवन योजना मंजूर आहेत. या योजनांपैकी २२९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४३२ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा दिला जातो. त्यानुसार आतापर्यत जलजीवन मिशनला शासनाकडून पहिल्या टप्यात २७ कोटी ४० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीमधून २२९ कामे पूर्ण झालेली आहे. २७ कोटी ४२ लाख रूपयाचा खर्च झालेला आहे.

प्रत्येकी तीन महिन्या टप्यात जलजीवन मिशनसाठी शासनाकडून निधी दिला जातो. परंतु एप्रिल महित्यात दिलेल्या २७ कोटी ४० लाखाच्या निधीचा अपवाद सोडला तर आता उर्वरित डिसेंबर अखेरपर्यतच्या कामासाठी सुमारे ४० कोटी रूपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केला आहे. मात्र यापैकी एक रूपयाचाही निधी अद्यापपर्यत मिळालेला नाही. त्यामुळे जलजीवन मिशनची जिल्हाभराती कामे विस्कळीत झालेली आहे.

११ कोटीचे देयके पडून

जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात कंत्राटदरांनी पाणी पुरवठयाची विविध कामे केलेली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर देयकांचे प्रस्तावही सादर केलेले आहेत. मात्र जलजीवन मिशन योजनेसाठी सध्या निधी उलब्ध झाला नसल्याने ११ कोटीची देयके पडून आहेत. त्यामुळे कंत्राटदारही त्रस्त झाले आहेत. कामे केल्यानंतरही देयके वेळेवर मिळालेले नाही. त्यामुळे पुढचे काम करण्यासाठी ठेकेदारांकडे निधी नाही, यामुळे कामे मुदतीत पूर्ण होणे शक्य नसल्याचे कंत्राटदरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद