शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कारागृहातील रिक्त पदांचा गुंता सुटेना; गृहमंत्री लक्ष देतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 15:55 IST

राज्यातील नऊपैकी सात मध्यवर्ती कारागृहांमध्ये अधीक्षक नाही

अमरावती : राज्यात मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये दीड वर्षात आठ हजार कैदी संख्या वाढली आहे, तर जेलरची १०० पदे रिक्त असून एकट्या विदर्भात ४० पदांचा अनुशेष आहे. नऊपैकी सात मध्यवर्ती कारागृहांत कायमस्वरूपी अधीक्षक नसल्याने अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कारागृहांमध्ये हीच स्थिती आहे. त्यामुळे कारागृहांच्या रिक्त पदांचा गुंता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कारागृहात अधीक्षक हे पद अतिशय महत्त्वाचे आहे. तथापि, नागपूर, अमरावती, येरवडा (पुणे), कोल्हापूर, औरंगाबाद, ठाणे, मुंबई या सातही मध्यवर्ती कारागृहात अधीक्षक नाही. अधीक्षक पदांसह डीआयजी मुख्यालय पुणे, कारागृह मध्य विभाग औरंगाबाद आणि पूर्व विभाग नागपूर येथे डीआयजी पदी पात्र अधिकारी शोधण्यात गृह विभाग नापास झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, यवतमाळ जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांच्या बदल्यांचा कालावधी होऊनही फाईल पुणे येथील गृह विभागात प्रलंबित आहे.

कैद्यांच्या नियमित कामांवरही परिणाम

कारागृहात क्षमतेपेक्षा कैदी बंदिस्त असून दीड वर्षात आठ हजार कैदी वाढले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे हे द्योतक आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने गत पाच वर्षांपासून सुरक्षारक्षक, हवालदार, तुरुंगाधिकारी, कारागृह अधीक्षक, कार्यालयीन कर्मचारी पदभरती केली नाही. मात्र, कैदी संख्या दरदिवशी वाढतच आहे. कारागृहात मनुष्यबळाचा वानवा असल्याने कैद्यांच्या नियमित तसेच न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत आहे.

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंगGovernmentसरकार