शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती आणणे आवश्यक

By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST

लोकांमध्ये पर्यावरणाविषयक जागृती करणे गरजेचे आहे. लोकांना पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचे महत्व ...

जागतिक पर्यावरण दिन : दिनेशकुमार त्यागी यांचे प्रतिपादनअमरावती : लोकांमध्ये पर्यावरणाविषयक जागृती करणे गरजेचे आहे. लोकांना पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचे महत्व समजावून दिले तर पुढच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखता येईल, असे प्रतिपादन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक, क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी केले.मध्यवर्ती रोपवाटिका, वडाळी वनपरिक्षेत्र येथे वन विभागामार्फत शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक दिनेशकुमार त्यागी होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य सीईओ अनिल भंडारी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक घुले, स्वप्नील सोनोने उपस्थित होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे, असे त्यागी म्हणाले. हवा, पाणी, अग्नी, जमीन व आकाश या पंचतत्त्वांचे ंरक्षण करुन पर्यावरणाचे संरक्षण करता येते. प्रदूषणामुळे पर्यावरणाला अधिक हानी पोहोचत आहे, हे प्रमाण कमी करुन आपण पर्यावरणाचे संवर्धन तसेच संरक्षण करु शकतो. प्लास्टिक नाशवंत नसल्याने प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी करुन पर्यावरणाला मोठा फायदा मिळू शकतो, असेही त्यागी म्हणाले. कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे झाड लावणे व ते जगवणे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुकर म्हणाले की, हवा, पाणी, वनस्पती व माणूस यासर्व बाबींनी पर्यावरण तयार होते. लोकसंख्यावाढीमुळे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. उत्तराखंडातील अतिवृष्टी हे पर्यावरण असंतुलनाचे एक मोठे उदाहरण आहे. सण, उत्सव निसर्गाला पूरक असणे आवश्यक आहे. पर्यावरणाला अनुसरुन सण साजरे केले पाहिजे, जेणेकरुन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. नागरिकांच्या व वन्यप्रेमींच्या मदतीने परिसरात झाडे लावावीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, भारत हा ऋतुंचा देश आहे. त्यामुळे तापमान नेहमी बदलत राहाते. पर्यावरणाच्या असमतोलामुळे दुष्काळ, पूर या समस्या निर्माण झाल्या आहेत. जलयुक्त शिवार हे अभियानाचे पहिले सत्र आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पर्यावरणाला फायदा मिळणार आहे. प्रारंभी वनपाल सलीम यांनी बांबुच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी देशातील व देशाबाहेरील वेगवेगळ्या बांबुच्या रोपांची माहिती उपस्थितांना दिली. प्रास्ताविक उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी तर आभार प्रदर्शन उपवनसंरक्षक घुले यांनी केले. सूत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप लाकडे व चमुने प्रयत्न केले.