तलाठ्यांनी पांदण रस्त्यांना महत्व द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:48 IST2017-08-16T22:47:52+5:302017-08-16T22:48:21+5:30
शेतकºयांना कुठेही सातबारा त्वरित मिळण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या डिजीटल सात-बारा मध्ये जिल्ह्यात तालुका अव्वल असल्याने ......

तलाठ्यांनी पांदण रस्त्यांना महत्व द्यावे
धामणगाव रेल्वे : शेतकºयांना कुठेही सातबारा त्वरित मिळण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या डिजीटल सात-बारा मध्ये जिल्ह्यात तालुका अव्वल असल्याने ही अभिमानास्पद बाब असून तलाठ्यांनी पांदन रस्त्याचे समस्येकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले़
स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर शेतकºयांसाठी आॅनलाईन सातबारा सुविधेची सुरुवात तहसील कार्यालयात वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी वनश्री लाभशेट्टीवार, तहसीलदार के़जी़ सूर्यवंशी, प़ंस़ सदस्य सविता इंगळे, गटविकास अधिकारी पंकज भोयर, सा़बां़चे उपविभागीय अधिकारी गणेश रंभाळ यांची उपस्थिती होती़
तालुक्यातील सातमंडळ विभागातील ३५ हजार ६६७ शेतकºयांचा सात-बारा, आॅन लाईन करून तालुक्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक घेतला़ ही कौतुकाची बाब आहे़ शेतकºयांचा महत्वाचा प्रश्न पांदण रस्त्याचा असल्याने प्रशासनाने पुढाकार धेवून ही बाब सोडवावी तसेच शहरातील मालमत्ता आॅनलाईन करण्यावर शासनाने भर देणे महत्वाचे आहे़ विम्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होण्याकरीता तलाठी व मंडळ अधिकाºयानी अधिक महत्व द्यावे, असेही आवाहन वीरेंद्र जगताप यांनी केले़
पुढील काळात सातबारा नंतर शेती विषयक महसुली सर्व दाखले आॅनलाईन होणार असल्याचे एसडीओ वनश्री लाभशेट्टीवार यांनी सांगितले़ प्रास्ताविक तहसीलदार के़जी़ सूर्यवंशी तर डिजीटल सातबारा विषयी अधिक माहिती गोपाल नागरीकर यांनी दिली़ संचालन किशोर जºहाड तर आभार ताकसांडे यांनी केले़ तालुक्यातील शेतकºयांना डिजिटल सातबारा आमदार जगताप यांच्या हस्ते देण्यात आला़