शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बँकेतील अनियमितता वानखडेंच्या जीवावर बेतली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:30 PM

अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर बँकेच्या वर्धा शाखेत ९.८१ कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाला.

ठळक मुद्देपत्रपरिषद : संचालक मंडळ अनभिज्ञ कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर बँकेच्या वर्धा शाखेत ९.८१ कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाला. तत्पूर्वी संपूर्ण संचालक मंडळ त्या अनियमिततेपासून अनभिज्ञ असल्याचा दावा डॉ़ पंजाबराव देशमुख अर्बन को.आॅप बँकेच्या उपाध्यक्षांसह संचालक मंडळाने केला आहे. बँकेच्या वर्धा शाखेतील ती अनियमितता वानखडेंच्या जीवावर बेतल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मात्र, ९.८१ कोटींचे कर्ज संचालक मंडळाला अंधारात ठेऊन कसे काय वितरित केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.संजय वानखडे यांच्या आत्महत्येची घटना बुधवारी उघड झाल्यानंतर गुरूवारी दुपारी उपाध्यक्ष संजय खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या वर्धा शाखेतील कोट्यवधींच्या अनियमिततेची माहिती दिली. संपूर्ण संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. वखार महामंडळाच्या गोदामात स्वत:च्या मालकीचे हजारो टन धान्य असल्याची वखार पावती देत वर्धेचे व्यावसायिक कैलास काकडे याने पंजाबराव बँकेच्या वर्धा शाखेतून कोट्यवधीचे कर्ज मिळविले. हासर्व व्यवहार बँक व्यवस्थापक अशोक झाडे यांच्या माध्यमातून झाला. लेखापरीक्षकाने याव्यवहारात अनियमिततेचा ठपका ठेवल्यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र, नेमका भ्रष्टाचार कसा घडला, हे आपण सांगू शकत नाही, असा पवित्रा संचालक मंडळाने घेतला.संजय वानखडे यांनीच या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती नेमली. त्यातून व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले. तर ४ सप्टेंबरला त्याबाबत वर्धा पोलिसांमध्ये तक्रार नोंदविल्याची माहिती देण्यात आली. कोट्यवधीचे कर्ज देत असताना कैलास काकडेचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले नाही का, या प्रश्नावर तज्ज्ञसंचालक प्रवीण पाटील यांनी नकारात्मक उत्तर दिले.शवविच्छेदन केंद्राजवळ चाहत्यांची गर्दीअमरावती : वखार पावतीवर ते कर्ज दिल्याने संचालक मंडळासमोर ते प्रकरण आलेच नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदामात असलेल्या एकूण मालाच्या किमतीवर ६० टक्के कर्जपुरवठा केला जातो. या प्रकरणात तिच प्रक्रिया अवलंबविली गेली. वर्षभर हा प्रकार उघडच झाला नाही. अहवालात ठपका ठेवण्यात आल्यानंतर संजय वानखडे यांच्या मनावर आघात झाला व त्यातून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असला तरी बँकेच्या भागधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेला राजेंद्र महल्ले, शरद अढाऊ, हेमंत देशमुख, दिलीप कोकाटे, सुरेश शिंगणे, यशवंत वडस्कर आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी संजय वानखडे यांचा मृतदेह राजापेठ पोलिसांच्या मदतीने इर्विनच्या शवविच्छेदन केंद्रात बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आणण्यात आला. गुरूवारी सकाळी ११ वाजता श्वविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता त्यांच्या समर्थ कॉलनीतील घरी नेण्यात आले. सकाळपासून शवविच्छेदन केंद्राजवळ विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बँकेचे संचालक, सहकारक्षेत्रातील नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.याप्रसंगी वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आ. अनिल बोंडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, काँग्रेसचे सचिव संजय खोडके, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, नगरसेवक विलास इंगोले, सोमेश्वर पुसदकर, अतुल गायगोले,विजय विल्हेकर, प्राचार्य दिलीप काळे यांच्यासह विविध पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. वैकुंठरथ दहा मिनिटे डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.-आॅप बँकेजवळ आणण्यात आला.येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.मृत्यूपूर्वी बहिण-भावाच्या नावे चिठ्ठीसंजय वानखडे यांनी मृत्यूपूर्व बहिण आणि भावाच्या नावे लिहीलेल्या दोन चिठ्ठ्या राजापेठ पोलिसांनी जप्त केल्या. बहिणीच्या नावे लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी नेत्रदान व देहदानाची ईच्छा व्यक्त केली. मात्र आत्महत्येनंतर दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आल्याने देहदान आणि नेत्रदान होऊ शकले नाही. पोलिसांच्या मते त्यांनी १८ सप्टेबरला सकाळी दहानंतर केव्हातरी आत्महत्या केली. देहदान शक्य झाले नाही तर आपल्या पार्थिवावर विद्युत दाहिनीमध्ये अंतिम संस्कार करावेत, अशी इच्छा त्यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली होती. त्यानुसार हिंदू स्मशानभूमितील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. वानखडे यांची अंतिम यात्रा अंबापेठ क्रीडा मंडळामध्ये पोहोचल्यानंतर तेथे श्रद्धांजली वाहण्यात आली. ते या मंडळाचे सक्रीय सदस्य आणि खेळाडू होते.