शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील इंटरनेट सेवा १९ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत बंद, संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 10:56 IST

आदेशानुसार, १३ ते १६ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. तर १६ रोजी पुन्हा ३ वाजतापासून १९ दुपारपर्यंत ती बंदी वाढविण्यात आली.

ठळक मुद्दे सुरू ठेवल्यास कारवाई : पोलीस आयुक्तांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या हिंसक घटनांच्या अनुषंगाने १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र, शहरातील परिस्थिती पाहता, आता ती सेवा १९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव, गृहविभागाकडे तसा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार, १९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयातील टू-जी, थ्री-जी, फोर-जी, सीडीएमए, जीपीआरएस, मेसेज सर्व्हिसेस, डोंगल सर्व्हिसेस, केबल इंटरनेट, वायरलाईन इंटरनेट, फायबर इंटरनेट, ब्राॅडबॅन्ड सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा तो आदेश सर्व स्थानिक इंटरनेट सर्व्हिस, मुख्य इंटरनेट सर्व्हिस यांना पाठविण्यात आला. 

१६ ते १९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ या कालावधीत शहर आयुक्तालय क्षेत्रात इंटरनेट सेवा चालू करण्यात आली, तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे शहर पोलिसांच्या विशेष शाखेने ऑनलाईन कळविले. मंगळवारी रात्री ७.१४ वाजता हे पत्र फ्लॅश करण्यात आल्याची नोंद विशेष शाखेने घेतली. मात्र, माध्यमांचे इंटरनेट बंद असल्याने ते वृत्त प्रकाशित करण्यास मर्यादा आल्या. 

पहिल्या आदेशानुसार, १३ ते १६ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. तर १६ रोजी पुन्हा ३ वाजतापासून १९ दुपारपर्यंत ती बंदी वाढविण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांची पार मुस्कटदाबी झाली आहे. 

या बंदीतून माध्यमांच्या कार्यालयांना वगळण्यात यावे, अशी विनंती केली असता,  पत्रकारांना शहराबाहेर १५ किमीवर जाण्याचा सल्ला दिला जातो.  विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाने जनहितार्थ जारी केलेले प्रसिद्धी पत्रकही इंटरनेटअभावी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू शकले नाही. 

बॅंकाचे काम नियमित शहरातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहाराबाबतच्या अडीअडचणी लक्षात घेऊन बॅंकेचे व्यवहार सुरळित राहावे, याकरिता १७ नोव्हेंबरपासून सर्व बॅंका नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात बँकांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. याबाबतची प्रेसनोट १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१७ वाजता जाहीर करण्यात आली, असे विशेष शाखेने म्हटले आहे. ती प्रेसनोट शहर आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. मात्र, इंटरनेट बंद असल्याने ती बॅंक व्यवस्थापन, प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे बुधवारी बहुतांश बॅंकातील कामकाज पूर्णपणे बंद होते. 

अनेकांनी धरली शहराबाहेरची वाटकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संचारबंदीसह इंटरनेट बंदी लागू केली. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी आता अनेकांनी मोबाईलची रेंज मिळविण्यासाठी शहराबाहेरील इंटरनेट कनेक्टिव्हीची रेंज असलेल्या रस्त्यांची वाट धरली असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावायास मिळत आहे. यामध्ये ऑनलाईन कामे करीत असलेले नागरिक तसेच ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच अन्य मोबाईलधारकांचा समावेश आहे.

ज्या ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळत आहे, त्याच ठिकाणी बस्तान मांडले असल्याचे चित्र शहरातून बाहेरगावाला जाणाऱ्या अनेक प्रमुख मार्गावर दिसून आले. आठवड्यात शनिवारपासून इंटरनेट बंदी सुरू आहे. त्यामुळे मोबाईलमधून केवळ संवाद साधता येतो. सोशल मीडिया पूर्णत: बंद आहे. एवढेच नव्हे तर मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार बंद पडले आहेत. इंटनेटची रेंज मिळविण्यासाठी शहराच्या सीमेवर जाऊन अनेक जण आपली ऑनलाईन कामे करून घेत आहेत. यात काहींना यश येत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकInternetइंटरनेटGovernmentसरकार