शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली

By गणेश वासनिक | Updated: July 3, 2023 15:33 IST

१ जुलैपासून प्रारंभ, रेल्वे स्थानकादरम्यान लाईनची क्षमता वाढली, एकाच वेळी दोन ट्रेन चालविता येणार

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ (आयबीएस) ही प्रणाली १ जुलैपासून कार्यान्वित केली आहे. या न्वया प्रणालीमुळे दाेन रेल्वे स्थानकादरम्यान एक ट्रेन एवेजी दाेन ट्रेन कंट्रोलिंग करता येते, हे विशेष. मनमाड रेल्वे स्थानक आणि समीट रेल्वे स्थानकादरम्यान लाईनची क्षमता वाढवण्यासाठी ही प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे.

नवीन आयबीएस स्टेशनच्या मदतीने २५४ किमी अंतरावर एकाच वेळी १ ट्रेन ऐवजी २ ट्रेन धावू शकते. त्यामुळे प्रत्येक ट्रेनच्या धावण्याच्या वेळेत ५ मिनिटे वाचणार आहे. प्रत्येक विभागात सुमारे ५० गाड्या धावतात. त्यामुळे लाईनची क्षमता वाढेल आणि वेळेची बचत होईल. हे नवीन आयबीएस स्थानक इगतपुरी-मनमाड सेक्शनवरील मनमाड स्थानकाजवळील व्यस्त मार्गावर देखील गर्दी कमी करेल. आतापर्यंत भुसावळ विभागात ३० आयबीएस स्टेशन उभारण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने महत्वाच्या स्टेशनवर नवी प्रणाली विकसीत केली जाणार आहे.

गाड्यांचे अपघात टाळता येणार

नवीन आयबीएस स्टेशनवर दोन नवीन सिग्नल नंबर पोस्ट बसवण्यात आल्या आहेत. सिमेन्सने नवीन ड्युअल डिटेक्शन एक्सल काउंटर बसवले. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या चाकांची संख्या मोजली जाईल. त्यामुळे दोन ट्रेनमध्ये होणारे अपघात टाळता येतील आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. या नव्या प्रणालीत स्टेटकॉन मेक आयपीएस २०० ॲपिअर क्षमतेच्या बॅटरीचा पुरवठा करण्यात आला आहे. आरटीयू बसवण्यात आले असून ते स्टेशनला चांगल्या दळणवळणासाठी जोडलेले आहे. रिलायन्स मेक फ्यूज अलार्मच्या माध्यमातून नव्या आयबीएस स्टेशनवर कोणत्याही प्रकारचा असामान्य शोध घेता येणार आहे.

‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ म्हणजे काय? 

‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ हे एक प्रकारचा स्टेशन आहे. ज्यामध्ये लाइन क्षमता वाढवण्यासाठी दोन स्टेशनमधील विभाग दोन भागात विभागला जातो. यात स्टेशनमध्ये सामान्य प्लॅटफॉर्म, स्टेशन प्रबंधकाची खोली आदी नाहीत. परंतु सिग्नल अप आणि डाउन लाईनवर आहेत, जे लगतच्या स्टेशनद्वारे नियंत्रित केले जातात. या २ स्थानकांदरम्यान १ ट्रेन चालवण्याऐवजी, आयबीएस स्टेशनच्या मदतीने २ ट्रेन चालविता येते. ज्यामुळे त्या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होते.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे