शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:18 AM

कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली.

ठळक मुद्देशासनाचा अहवाल : यंदा पाच महिन्यांत ९५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली. यामध्ये तीन जनांचा मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. कीटकनाशक कंपन्यांद्वारा शेतकºयांना सुविधेची साधने पुरवीत नसल्यानेच फवारणी शेतकºयांच्या जीवावर उठली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत ५०५ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली. यामध्ये २०१२ मध्ये ७२, सन २०१३ मध्ये ५५, सन २०१४ मध्ये ६२, सन २०१५ मध्ये ५७, सन २०१६ मध्ये ५० तर सन २०१६ मध्ये सर्वाधिक २०९ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची विषबाधा झाली. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात २० तर विदर्भात ३५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कीटकनाशकांचा फवारणी ही मृत्यूचीच फवारणी असल्याची बाब प्रथम उघडकीस आली. त्यानंतर शासनाने याविषयी गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. कृषी विभागाद्वारा याविषयी जनजागृती करण्यात येत असली तरी यावर प्रभावी अंलबजावणी नसल्यामुळेच सध्याही शेतकरी विषबाधित होत असल्याचे वास्तव आहे.पेरणीनंतरच्या चार महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणवर विषबाधितांचे प्रकरण समोर येत आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ३, मार्च ५, एप्रिल ३, मे ६, जून १०, जुलै १७, आॅगस्ट ३५, सप्टेेंबर ६२ आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर २६ व डिसेंबर महिन्यात ४ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.२.१० लाखांच्या साठ्यास विक्रीबंदचे आदेशगुण नियंत्रण पथकाने जिल्ह्यातील कीटकनाशकांचे १२२ सॅम्पल घेतले. यामध्ये ५ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. ९१५ परवान्यांची तपासणी केली असता ५५७ मे.टन साठ्यास विक्रीबंदचे आदेश देण्यात आले. याची किमंत २.१० लाख आहे. विभागीय गुण नियंत्रण पथकाने अखेर ही कारवार्ई केल्याचे कृषी विभागाने सांगितले.