शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सुधारित पैसेवारीसाठी पश्चिम विदर्भाला उफराटा न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:45 IST

दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली.

ठळक मुद्देबाधित खरिपाची ६० पैसेवारी परतीच्या पावसाने ५३८२ गावांत १२.२२ लाख हेक्टरमध्ये नुकसान

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. महसूल यंत्रणाद्वारे या बाधित पिकांचे सर्वेक्षण सुरू असताना विभागीय आयुक्तांनी १ नोव्हेंबरला विभागाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैसे असून, यामध्ये फक्त अकोला जिल्ह्याला न्याय देण्यात आला, तर अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात वस्तुस्थिती अव्हेरली गेली आहे.अमरावती विभागात १८ ते २८ आॅक्टोबर दरम्यान ८४.१ मिमी पाऊस पडला. ही अपेक्षित ४५ मिमी पावसाच्या तुलनेत टक्केवारी १८६.५ आहे. या परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वार, मका, धान पीक होत्याचे नव्हते झाले. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पीक सडले. गंज्या ओल्या झाल्याने बीजांकुर फुटले. दाण्यांना बुरशी चढली. कापूस ओला झाला. सरकीला बीजांकुर फुटले. ज्वारीची कणसे जागेवर सडायला लागली आहेत. ज्वारी काळी झाल्याने प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांसमोर समोर जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला असताना महसूल विभागाद्वारे जाहीर सुधारित पैसेवारीत मात्र खरिपाचे चित्र आॅलवेल असे मांडण्यात आल्याची शोकांतिका आहे.सुधारित पैसेवारीमध्ये अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांत ४८ पैसेवारी जाहीर झाल्याने न्याय मिळाला. मात्र, अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ६२, वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ६१, यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ५८ व बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ६९ सुधारित पैसेवारी दाखविण्यात आली. अद्याप अंंतिम पैसेवारी बाकी असली तरी महसूल विभागाद्वारे वस्तुस्थिती डावलण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.पश्चिम विदर्भात खरिपाचे बाधित क्षेत्रविभागीय आयुक्तांच्या निर्देशान्वये बाधित खरिपाचे संयुक्त सर्वेक्षण महसूल यंत्रणा २९ आॅक्टोबरपासून युद्धस्तरावर करीत आहे, मात्र, याच यंत्रणाद्वारे खरिपाची सुधारित पैसेवारी ६० दाखविण्यात आली. विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात १,४५,०५३ हेक्टर, अकोला ३,२३,५३५, बुलडाणा ५,१९,१९६, यवतमाळ १,०४,५५९ व वाशिम जिल्ह्यात १,२५,९३५ हेक्टरमधील पिके ३३ टक्क्यांवर बाधित झाली आहेत. तरीदेखील सुधारित पैसेवारी ६० कशी, अशा शेतकऱ्यांचा सवाल आहे.जिल्हानिहाय सुधारित पैसेवारीजिल्हा                     गावे                     पैसेवारीअमरावती                १९६१                        ६२अकोला                   ९९०                         ४८यवतमाळ                २०४८                     ५८वाशिम                       ७९३                        ६१बुलडाणा                   १४१९                       ६९एकूण                        ७२९९                         ६०

टॅग्स :Farmerशेतकरी