शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

कोविड रेल्वे पार्सलमधून उत्पन्नवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कोविड पार्सल ही ९ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. मात्र, एप्रिल महिन्यात फारशा प्रमाणात या रेल्वे गाडीतून मालाची वाहतूक झाली नाही. केवळ दोन, चार दिवस औषधांचे पार्सल बाहेर गावाहून मागविण्यात आले. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे टप्पे वाढत गेले. यामध्ये शिथिलता येताच अमरावती येथील औषध विक्रेत्यांनी अहमदाबाद, रायपूर, राजकोट आदी ठिकाणांहून पार्सल बॉक्स मागविले आहे.

ठळक मुद्देमुंबईकडे मासे, भाजीपाला रवाना : अहमदाबाद, रायपूर, राजकोट येथून औषधी मागविण्यास पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लॉकडाऊन’च्या काळात रेल्वे बोर्डाने ९ एप्रिलपासून सुरू केलेल्या कोविड पार्सलमधून उत्पन्न वाढीस लागले आहे. मे, जून या दोन महिन्यात मालाची वाहतूक वाढली असून, जिल्ह्यातून दरदिवशी मासे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू पाठविल्या जात आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या मालातून दरदिवशी चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.कोविड पार्सल ही ९ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. मात्र, एप्रिल महिन्यात फारशा प्रमाणात या रेल्वे गाडीतून मालाची वाहतूक झाली नाही. केवळ दोन, चार दिवस औषधांचे पार्सल बाहेर गावाहून मागविण्यात आले. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे टप्पे वाढत गेले. यामध्ये शिथिलता येताच अमरावती येथील औषध विक्रेत्यांनी अहमदाबाद, रायपूर, राजकोट आदी ठिकाणांहून पार्सल बॉक्स मागविले आहे. हल्ली नियमितपणे औषधांचे पार्सल मागविले जात आहे.पोरबंदर- शालीमार व हावडा-शालीमार, नागपूर-शालीमार अशा कोविड रेल्वे पार्सल सुरू आहे. औषधांचे १०० ते १५० बॉक्स मागविण्यात येत असल्याची नोंद रेल्वे पार्सल विभागात करण्यात आली आहे. तर, मुंबईकडे पाठविले जाणारे मासे, भाजीपाल्यातून रेल्वेला उत्पन्न मिळत असल्याची माहिती पार्सल विभागाचे प्रमुख व्ही. एस. चारदेवे यांनी दिली.अहमदाबादमार्गे प्रवाशांची गर्दीहावडा- अहमदाबाद एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल अशा दोन प्रवासी गाड्या १ जूनपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून धावत आहेत. मात्र, अहमदाबाद मार्गे जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढली असून, मुंबईकडे प्रवाशांची तूर्तास पसंती नसल्याचे आरक्षण यादीवरून दिसून येत आहे. हावडा- अहमदाबाद एक्सप्रेसने दरदिवशी १५ ते २० प्रवासी जात असल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने देशभरात १०० विशेष प्रवासी गाड्या सुरू केल्या असून, यात दोन गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकाहून धावत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे