शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाणा तेलाची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:17 IST

तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक, आरोग्यावर गंभीर परिणाम अमरावती : तेल हा जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे ...

तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक, आरोग्यावर गंभीर परिणाम

अमरावती : तेल हा जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे जेवणात सर्रास रिफाइंड तेलाचा वापर केला जात आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह ह्रदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे बहुतांश नागरिक घाणा तेलाकडे वळू लागले आहेत. परिणामी घाणा तेलाची मागणी वाढली आहे.

अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि ह्रदयाशी संबंधित विकारांना आपसुक आमंत्रण मिळते. त्यामुळे काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची काही मोजकीच दुकाने आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्टेरॉल अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ट्रेंडला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.

बॉक्स

म्हणून वाढत आहेत ह्रदयरोगी

ह्रदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

बॉक्स

गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी

शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेला हाडेन्सिटी तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो. ह्रदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञ सुजय पाटील यांनी सांगितले.

बॉक्स

घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. तेलबियांतील एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

बॉक्स

रिफाइंड तेल घातक कसे?

अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही. सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंट, हेक्सेन अशा प्रकारचा केेमिकल्सचा वापर होत असून, ते मानवी शरीरासाठी धोकादायक ठरतो. रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो. कारण त्यातले अँटी ॲसिड आधीच बाहेर काढलेले असते.