शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाणा तेलाची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:17 IST

तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक, आरोग्यावर गंभीर परिणाम अमरावती : तेल हा जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे ...

तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक, आरोग्यावर गंभीर परिणाम

अमरावती : तेल हा जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे जेवणात सर्रास रिफाइंड तेलाचा वापर केला जात आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह ह्रदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे बहुतांश नागरिक घाणा तेलाकडे वळू लागले आहेत. परिणामी घाणा तेलाची मागणी वाढली आहे.

अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि ह्रदयाशी संबंधित विकारांना आपसुक आमंत्रण मिळते. त्यामुळे काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची काही मोजकीच दुकाने आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्टेरॉल अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ट्रेंडला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.

बॉक्स

म्हणून वाढत आहेत ह्रदयरोगी

ह्रदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

बॉक्स

गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी

शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेला हाडेन्सिटी तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो. ह्रदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञ सुजय पाटील यांनी सांगितले.

बॉक्स

घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. तेलबियांतील एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

बॉक्स

रिफाइंड तेल घातक कसे?

अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही. सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंट, हेक्सेन अशा प्रकारचा केेमिकल्सचा वापर होत असून, ते मानवी शरीरासाठी धोकादायक ठरतो. रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो. कारण त्यातले अँटी ॲसिड आधीच बाहेर काढलेले असते.